शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

१२५ शहरे २ आॅक्टोबरपर्यंत हागणदारीमुक्त

By admin | Updated: August 25, 2016 05:29 IST

२ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील 125 शहरे हागणदारी मुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई : ‘अमृत मिशन’साठी राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली असून या शहरांमध्ये सुरु असलेली कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याबरोबरच येत्या २ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील 125 शहरे हागणदारी मुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.अमृत मिशन, स्मार्ट शहरे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आदींचा आढावा फडणवीस यांनी आज मंत्रालयात घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पुणे आणि सोलापूरसाठी २७९ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अमृत मिशनसाठी राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली असून या शहरांमध्ये राज्यातील ७६ टक्के नागरी वस्ती आहे. सॅपमधून राज्यात येत्या तीन वर्षांत ७ हजार २२७ कोटी रु पयांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये केंद्र शासन ३६०० कोटी रु पये, राज्य शासन १८०० कोटी रु पये तर संबंधित शहरे १८०० कोटी रु पये उपलब्ध करु न देणार आहे. यंदा १ हजार ९८९ कोटी रुपयांचे २२ प्रकल्प सुरू होतील. त्यात अचलपूर, यवतमाळ, वर्धा, उस्मानाबाद, मालेगांव, सातारा, सोलापूर, इचलकरंजी, हिंगणघाट, अमरावती, लातूर, जळगांव अहमदनगर, वसई-विरार, अंबरनाथ, पनवेल, कुळगाव-बदलापूर, पिंपरी चिंचवड या शहरातील पाणीपुरवठयाचे २१ तर उल्हासनगर येथील घनकचऱ्याच्या एका प्रकल्पाचा समावेश आहे. पुढील वर्षी २४८९ कोटी रु पयांचे २५ प्रकल्प राबविणार असून त्यामध्ये पाणी पुरवठयाचे १४ तर घनकचऱ्याचे १० व सांडपाण्याचा पुनर्वापराचा एक प्रकल्प आहे. त्यानंतरच्या वर्षी २७४८ कोटी रु पयांचे प्रकल्प करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>गेल्या १० वर्षापासून सुरु असलेले ८११० कोटी रु पयांच्या १४० प्रकल्पापैकी ५५ प्रकल्प २०१६-१७ मध्ये पूर्ण करण्यात येतील. त्यामध्ये चंद्रपूर, परभणी, कोल्हापूर, इचलकरंजी, सावनेर, पुसद, औरंगाबाद, अमरावती येथील प्रकल्पांचा समावेश आहे. तर उर्वरित ८५ प्रकल्प २०१७-१८ मध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत.स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात १.८७ लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक १२९८२ शौचालये पुणे महापालिकेने बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तेथील महापालिका आयुक्तांचे अभिनंदन केले.