शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

१२ वर्षांचा दक्ष कसाऱ्यातून गायब

By admin | Updated: July 7, 2015 22:15 IST

कसारा येथे राहून आसनगाव (सावरोली) येथे शिक्षण घेणारा दक्ष रामदास खानझोडे हा १२ वर्षीय मुलगा २ जुलै पासून घरातून बेपत्ता झाला असून आजपावेतो तपास न लागल्याने

प्रगती जाधव-पाटील - सातारा -पुरूषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिलांना कुठेच तडजोड नको आहे. घर, नोकरी, समाज या तिन्ही आघाड्यांवर लढताना आणि स्वत:ला सिध्द करताना अनेक महिला ‘सुपर वुमन सिंड्रोम’च्या बळी पडू लागल्या आहेत. साताऱ्यातील सुमारे ८० टक्के महिलांमधील हे चित्र चिंताजनक आहे.जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या महिलांचा टक्का वाढत असून त्यांच्यात ‘सुपर वुमन सिंड्रोम’ या आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. नोकरी आणि घर सांभाळताना महिलांची होणारी तारांबळ आणि प्रत्येक आघाडीवर ‘उत्कृष्ट’ ठरण्याचा हट्ट आता महिलांना खचवू लागला आहे. ‘तिला जमते तर मला का नाही’ ही भावना मनात जन्म घेते आणि मग पुढे सगळे द्वंद्व सुरू होते. घराबाहेर पडून महिला अर्थाजन करायला शिकली पण घरात असूनही पुरूष घरकाम नाही शिकला. नेमकी हीच गोष्ट महिला दुर्लक्ष करतात. महिला आणि पुरूषांमधील हा मोठा फरक आहे. घर म्हटलं की त्याची जबाबदारी माझीच ही महिलांची भावना असते. वास्तविक ही जबाबदारी विभागली गेली पाहिजे, ही मानसिकता घरात कोणाचीच नसते. कारण वर्षानुवर्षे हे काम महिलांच्या माथीच मारले गेले आहे. (कोणत्या महिला आहेत याचा बळी, वाचा उद्याच्या अंकात.)पुरूष कधी घेणार जबाबदारीसंसाराला हातभार किंवा करिअर म्हणून महिलांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कमावती बायको असावी अशी इच्छा व्यक्त करणारे उपवरही आहेत. पण तिच्या बरोबरीने संसाराची आणि घराची जबाबदारी घेणारे बोटावर मोजण्या इतपतच आहेत. बायकोचा पगार सेव्हिंगला टाकणाऱ्या काही पुरूष मंडळींना तिला मदत करणे कमीपणाचे वाटते. जसे महिला हे माझं काम आहे आणि ते मी केलं पाहिजे, असे जशी म्हणते, तसंच पुरूषांमध्ये या कर्तव्यांची जाणीव येणार कधी?सुपर वुमन सिंड्रोम म्हणजे काय?प्रत्येक ठिकाणी स्वत:ला अव्वल सिध्द करणं, कुठेही तडजोड न करणं आणि सगळ्याची जबाबदारी माझीच आहे, असे वाटणे ही सगळी लक्षणे सुपर वुमन सिंड्रोमची आहेत. समाजाने आपल्याला नावे ठेवू नयेत म्हणून महिला स्वत:च स्वत:विषयीच्या अपेक्षा वाढवून ठेवतात. जिथं महिला दोन आघाड्यांवर लढतात, तिथे हा त्रास होतो. यामुळे कालांतराने महिलांना पराभूत झाल्याची भावना निर्माण होते. अपयश किंवा परावलंबनाची त्यांना प्रचंड चिड येते. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.सगळ्याच गोष्टींमध्ये मी अव्वल राहणार या अट्टहासापायी महिला स्वत:चे नुकसान करून घेते. पुरणाची पोळी नाही आली तर काय झालं इतरांपेक्षा अन्य बऱ्याच गोष्टी मी चांगल्या करू शकते, हा विचार महिलांमध्ये रूजणे आवश्यक आहे. सगळीकडे सर्वोत्तम राहण्याच्या अट्टहासापायी महानगरांमधील हे ‘सुपर वुमन सिंड्रोम’ आता साताऱ्यातही घराघरांत वाढू लागले आहे. याला कुटुंबातील सर्वांनी मिळून हद्दपार केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या कामाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.- डॉ. राजश्री देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ