शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांचा दक्ष कसाऱ्यातून गायब

By admin | Updated: July 7, 2015 22:15 IST

कसारा येथे राहून आसनगाव (सावरोली) येथे शिक्षण घेणारा दक्ष रामदास खानझोडे हा १२ वर्षीय मुलगा २ जुलै पासून घरातून बेपत्ता झाला असून आजपावेतो तपास न लागल्याने

प्रगती जाधव-पाटील - सातारा -पुरूषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिलांना कुठेच तडजोड नको आहे. घर, नोकरी, समाज या तिन्ही आघाड्यांवर लढताना आणि स्वत:ला सिध्द करताना अनेक महिला ‘सुपर वुमन सिंड्रोम’च्या बळी पडू लागल्या आहेत. साताऱ्यातील सुमारे ८० टक्के महिलांमधील हे चित्र चिंताजनक आहे.जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या महिलांचा टक्का वाढत असून त्यांच्यात ‘सुपर वुमन सिंड्रोम’ या आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. नोकरी आणि घर सांभाळताना महिलांची होणारी तारांबळ आणि प्रत्येक आघाडीवर ‘उत्कृष्ट’ ठरण्याचा हट्ट आता महिलांना खचवू लागला आहे. ‘तिला जमते तर मला का नाही’ ही भावना मनात जन्म घेते आणि मग पुढे सगळे द्वंद्व सुरू होते. घराबाहेर पडून महिला अर्थाजन करायला शिकली पण घरात असूनही पुरूष घरकाम नाही शिकला. नेमकी हीच गोष्ट महिला दुर्लक्ष करतात. महिला आणि पुरूषांमधील हा मोठा फरक आहे. घर म्हटलं की त्याची जबाबदारी माझीच ही महिलांची भावना असते. वास्तविक ही जबाबदारी विभागली गेली पाहिजे, ही मानसिकता घरात कोणाचीच नसते. कारण वर्षानुवर्षे हे काम महिलांच्या माथीच मारले गेले आहे. (कोणत्या महिला आहेत याचा बळी, वाचा उद्याच्या अंकात.)पुरूष कधी घेणार जबाबदारीसंसाराला हातभार किंवा करिअर म्हणून महिलांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कमावती बायको असावी अशी इच्छा व्यक्त करणारे उपवरही आहेत. पण तिच्या बरोबरीने संसाराची आणि घराची जबाबदारी घेणारे बोटावर मोजण्या इतपतच आहेत. बायकोचा पगार सेव्हिंगला टाकणाऱ्या काही पुरूष मंडळींना तिला मदत करणे कमीपणाचे वाटते. जसे महिला हे माझं काम आहे आणि ते मी केलं पाहिजे, असे जशी म्हणते, तसंच पुरूषांमध्ये या कर्तव्यांची जाणीव येणार कधी?सुपर वुमन सिंड्रोम म्हणजे काय?प्रत्येक ठिकाणी स्वत:ला अव्वल सिध्द करणं, कुठेही तडजोड न करणं आणि सगळ्याची जबाबदारी माझीच आहे, असे वाटणे ही सगळी लक्षणे सुपर वुमन सिंड्रोमची आहेत. समाजाने आपल्याला नावे ठेवू नयेत म्हणून महिला स्वत:च स्वत:विषयीच्या अपेक्षा वाढवून ठेवतात. जिथं महिला दोन आघाड्यांवर लढतात, तिथे हा त्रास होतो. यामुळे कालांतराने महिलांना पराभूत झाल्याची भावना निर्माण होते. अपयश किंवा परावलंबनाची त्यांना प्रचंड चिड येते. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.सगळ्याच गोष्टींमध्ये मी अव्वल राहणार या अट्टहासापायी महिला स्वत:चे नुकसान करून घेते. पुरणाची पोळी नाही आली तर काय झालं इतरांपेक्षा अन्य बऱ्याच गोष्टी मी चांगल्या करू शकते, हा विचार महिलांमध्ये रूजणे आवश्यक आहे. सगळीकडे सर्वोत्तम राहण्याच्या अट्टहासापायी महानगरांमधील हे ‘सुपर वुमन सिंड्रोम’ आता साताऱ्यातही घराघरांत वाढू लागले आहे. याला कुटुंबातील सर्वांनी मिळून हद्दपार केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या कामाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.- डॉ. राजश्री देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ