शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पालिका बांधणार १२ नव्या शाळा, नियोजन आराखड्यातील तरतुदी रखडत असल्याने निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 02:30 IST

विकास नियोजन आराखड्यातील तरतुदी कागदावरच राहात असल्याने, महापालिकेने या वर्षीपासून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच, काही नागरी सुविधांवर काम सुरू केले आहे.

मुंबई : विकास नियोजन आराखड्यातील तरतुदी कागदावरच राहात असल्याने, महापालिकेने या वर्षीपासून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच, काही नागरी सुविधांवर काम सुरू केले आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची गळती सुरू असताना, पालिकेने २८ हजार ४५२ चौरस मीटर आकाराच्या १२ नवीन शाळा सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. या शाळांच्या बांधकामासाठी २६ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद २०१७-१८च्या अर्थसंकल्पात केली आहे.महापालिकेचा प्रस्तावित ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर झालेला नाही. तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेल्या नागरी सेवा-सुविधा निर्माण करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. विकास आराखडा २०३४ साठी पालिकेने अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे. हा २० वर्षांचा आराखडा चार पंचवार्षिक टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. तसेच प्रत्येक पंचवार्षिक टप्पादेखील पुन्हा वार्षिक टप्प्यामध्ये विभागला आहे. याप्रमाणे, विकास नियोजन आराखड्यानुसार प्रत्येक वर्षी नवीन कामांसाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.१९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखड्यातील शिक्षणाशी संबंधित आरक्षणे, जशीच्या तशी २०३४ च्या प्रारूप विकास आराखड्यात दर्शविण्यात आली आहेत. या आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात असून, मोकळ्याही आहेत, तसेच या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत.त्यामुळे पालिका शाळांसाठी आरक्षित असलेले १० भूखंड, तर पालिकेच्या ताब्यात असलेले इतर दोन भूखंड अशा एकूण १२ भूखंडांवर शाळा बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनीदिली.शाळांची सद्य:स्थितीसध्या महापालिकेच्या एक हजार ४८ प्राथमिक शाळा असून, त्यात दोन लाख ८७ हजार ९७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर महापालिकेच्या १४७ माध्यमिक शाळांमध्ये ३५ हजार ९२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.तर ४२२ अनुदानित शाळांमधून एक लाख ३८ हजार ४४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यानुसार, एकूण एक हजार ६१७ शाळांमधून चार लाख ६२ हजार ३४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ६९३ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये तीन लाख २५ हजार ४२१ विद्यार्थी आहेत.