शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

सात महिन्यांत १२ डॉक्टरांवर हल्ले

By admin | Updated: August 1, 2016 04:47 IST

सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत रुग्णांची सेवा करण्यासाठी निवासी डॉक्टर २४ तास आॅन ड्युटी असतात.

मुंबई : सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत रुग्णांची सेवा करण्यासाठी निवासी डॉक्टर २४ तास आॅन ड्युटी असतात. पण, या रुग्णालयांत रुग्णाचा मृत्यू झाल्यास काही रुग्णांचे नातेवाईक निवासी डॉक्टरांना मारहाण करतात. जानेवारी ते जुलै २०१६ यादरम्यान १२ निवासी डॉक्टरांना मारहाण झाली. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारने आश्वासने दिली. मात्र, ते अजूनही असुरक्षित असल्याचे ३० जुलैला रात्री पुण्यातील ‘बीजेएमसी’ रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर स्पष्ट झाले. निवासी डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचे प्रकार रोखण्यासाठी रुग्णाबरोबर दोनच नातेवाईक असावेत, अशी मागणी करण्यात आली होती. कारण, समूहाची मानसिकता वेगळी असते. एकाचवेळी अनेक जण आल्यास त्यांना विरोध करणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णाबरोबर एक नातेवाईक असा नियम लागू करण्यात आला होता. पण, त्याचे पालन केले जात नाही. राज्यातील सर्व शासकीय आणि महापालिका रुग्णालयांमध्ये मिळून ८९६ सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन सरकारने सप्टेंबर २०१५मध्ये दिले होते. हीच माहिती लिखित स्वरूपात उच्च न्यायालयात सादर केली होती. काही ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. पण, ते सुरक्षारक्षक गांभीर नाहीत, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. या आठवड्यातच नांदेड आणि काल पुणे येथे मारहाणीचे प्रकार घडले. सरकार निवासी डॉक्टरांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत आहे का, असाच प्रश्न उपस्थित होत असल्याचे मार्ड पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डॉक्टर संरक्षण कायद्यातील तरतुदीत बदल करण्यात यावा, अशी मागणीही मार्डने केली आहे. या कायद्यांतर्गत आरोपीला एका दिवसात जामिनावर सोडले जाते. आरोपींना आठ दिवसांसाठी अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मार्ड लढा देत आहे. तरीही हा प्रश्न सुटला नसल्याने मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)