शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

१२ लाख कोटी रुपयांचे करार, २६.७९ लाख रोजगार निर्माण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 06:46 IST

राज्य सरकारने आयोजित केलेली ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूक परिषद चांगलीच फलदायी ठरत आहे. पायाभूत सुविधांबरोबर वस्रोद्योग, बायोटेक, बांबू उद्योग, लॉजिस्टीक्स, अ‍ॅग्रोटेक अशा

मुंबई : राज्य सरकारने आयोजित केलेली ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूक परिषद चांगलीच फलदायी ठरत आहे. पायाभूत सुविधांबरोबर वस्रोद्योग, बायोटेक, बांबू उद्योग, लॉजिस्टीक्स, अ‍ॅग्रोटेक अशा विविध क्षेत्रांत उद्योग उभारणीसाठी १२ लाख कोटींचे ४३ गुंतवणूक करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून २६.७९ लाख रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तकेला आहे.२०२२ सालापर्यंत सर्वांना स्वस्तात घरे देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. या उपक्रमांतर्गत राज्य सरकारने १४.४० लाख घरांच्या निर्मितीचे सामंजस्य करार या परिषदेत केले. सर्वांत मोठी गुंतवणूक ‘क्रेडाई’ महाराष्ट्र करीत असून त्यांनी १ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ५ लाख घरे उभारण्याचा संकल्प केला आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ९० हजार कोटी रुपये गुंतवून ३ लाख स्वस्तातील घरे बांधणार आहे.महाराष्ट्र चेम्बर आॅफ हाउसिंग अ‍ॅण्ड इंडस्ट्री (एमसीएचआय) यांनीही ७५ हजार कोटी रुपयांत अडीच लाख घरांचे आश्वासन सामंजस्य कराराद्वारे दिले आहे. राज्यातील जवळपास अडीच लाख सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांना सहकार्य देण्यासाठी एस बँकेने १० हजार कोटी रुपयांचा करार केला.पालघरसाठी विशेष औद्योगिक क्षेत्रपालघर जिल्ह्यात स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र नाही. त्यामुळे तिथे ‘छत्रपती शिवाजी औद्योगिक शहर’ या नावाने १२ हजार कोटी रुपये खर्चून विशेष औद्योगिक क्षेत्र उभे केले जाणार आहे.व्हर्जिन हायपरलूप ही कंपनी सध्या जगभरात चर्चेचा विषय आहे. कंपनीचे अध्यक्ष रिचर्ड ब्रॅन्सन यांनी परिषदेच्या उद्घाटनातच अति जलद वेगाने धावणारी हायपरलूप रेल्वे भारतात आणणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार कंपनीने पुणे महानगर विकास प्राधिकरणाशी सामंजस्य करार केला. या प्रकल्पातसुमारे ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या अतिजलद रेल्वेमुळे पुणे-मुंबई प्रवास अवघ्या २० मिनिटांत करता येईल, असा कंपनीचा दावा आहे.कार्यक्रमात गोंधळच गोंधळजगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आयोजित केलेल्या या परिषदेतील संयोजकांमध्येच समन्वय नसल्याने उद्योजकांसमोर सरकारची नाचक्की झाली. उद्योजकांसमोर सामंजस्य करार करण्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. कुणाचा करार कधी होणार, याचे नियोजन नसल्यामुळे नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींचा गोंधळ उडाला.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रचंड मोठे जाळे उभारून आणि पाच लाख घरांच्या निर्मितीसह विविध योजना हाती घेऊन मुंबईचा चेहरामोहरा येत्या पाच वर्षांत बदलल्याशिवाय राहणार नाही.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीकोकणलामिळाली गुंतवणूकसिंधुदुर्ग जिल्ह्यात ७.५६ कोटी रुपये खर्चून काथ्यावर आधारित उद्योग उभा केला जाणार आहे.यासोबतच बांबू आणि त्यापासूनच्या उद्योगांसंबंधी मनुष्यबळ निर्मितीचा सामंजस्य करारही सोमवारी झाला. कोकण बांबू व केन फाउंडेशन याबाबत प्रशिक्षण देणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस