शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

दिव्यात पाण्याविना १२ तास!

By admin | Updated: April 28, 2016 03:46 IST

दिवा हे शहर ठाणे महापालिकेत असूनही तेथील तीव्र पाणीटंचाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यासाठी त्यांनी एमआयडीसीला दोषी ठरवले आहे

ठाणे : दिवा हे शहर ठाणे महापालिकेत असूनही तेथील तीव्र पाणीटंचाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यासाठी त्यांनी एमआयडीसीला दोषी ठरवले आहे. या टंचाईविरोधात प्रा. कृष्णमूर्ती शिवा अय्यर यांनी नुकतेच १२ तास पाण्याविना राहून उपोषण केले. पण, त्याची दखल पालिकेने घेतलीच नाही. त्यामुळे दिव्यातील जनतेला पाणी मिळो किंवा न मिळो, त्याच्याशी ठाणे महापालिकेला देणेघेणे नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिव्यात पाणीटंचाई असल्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने महिलांना पाण्यासाठी प्रसंगी मुंब्रा, ठाकुर्लीपर्यंत धाव घ्यावी लागते. ‘कॉमन मॅन’साठी लढा देणारे प्रा. अय्यर डोंबिवलीत सागावमध्ये राहतात. हे गाव महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांपैकी आहे. या गावातही पाणीटंचाई आहे. रविकिरण सोसायटीत पाणी येत नाही. तेथे पोहोच रस्ता नाही. यासाठी अय्यर यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यांनी उपोषणही केले होते. तसेच डोंबिवली ते मंत्रालय पदयात्रा केली. विमानतळाच्या विरोधासाठी डोंबिवली ते दिल्ली सायकलने प्रवास केला. अय्यर हे दिव्यातील पश्चिम भागात साऊथ इंडियन शाळा चालवतात. या शाळेत किमान एक हजार ५०० विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. या शाळेतही पाणी येत नाही. दिव्यातील पश्चिम भागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्याविरोधात अय्यर यांनी महावीर जयंतीला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत १२ तास पाण्याविना काढले. त्यांच्या सोबतीला दोन विद्यार्थीही होते. शाळेत पिण्यासाठी पाणी येत नाही. या परिसरातील महिला पाण्यासाठी मुंब्रा व ठाकुर्ली परिसरात धाव घेत आहेत. इतके भयाण चित्र दिवा परिसरात आहे. दिवा हे ठाण्याचे उपनगर आहे. पण, ठाणे महापालिका या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. १२ तास पाण्याविना आंदोलन करून अय्यर यांनी महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी त्याला थंड प्रतिसाद देत केवळ निवेदन स्वीकारले. मात्र, पाणी कधी येईल, काय केले जाईल, याविषयी आश्वासन दिले नाही. (प्रतिनिधी)