शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
3
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा
4
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
5
गुंतवणूकदारांसाठी 'डिव्हिडंड'चा डबल धमाका! BEL, DLF सह 'या' कंपन्या देणार छप्परफाड लाभांश
6
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
7
इस्रायलचे गाझावर हल्ले, विरोधात 22 देश एकवटले; पण एकाही मुस्लिम देशाचा पाठिंबा नाही...
8
Mumbai Local Train: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंब्रा- कळवा मार्गावर लोकलची बैलाला धडक
9
अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?
10
पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये
11
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
12
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
13
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
14
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
15
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
16
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
17
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
18
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
19
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
20
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story

दिव्यात पाण्याविना १२ तास!

By admin | Updated: April 28, 2016 03:46 IST

दिवा हे शहर ठाणे महापालिकेत असूनही तेथील तीव्र पाणीटंचाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यासाठी त्यांनी एमआयडीसीला दोषी ठरवले आहे

ठाणे : दिवा हे शहर ठाणे महापालिकेत असूनही तेथील तीव्र पाणीटंचाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यासाठी त्यांनी एमआयडीसीला दोषी ठरवले आहे. या टंचाईविरोधात प्रा. कृष्णमूर्ती शिवा अय्यर यांनी नुकतेच १२ तास पाण्याविना राहून उपोषण केले. पण, त्याची दखल पालिकेने घेतलीच नाही. त्यामुळे दिव्यातील जनतेला पाणी मिळो किंवा न मिळो, त्याच्याशी ठाणे महापालिकेला देणेघेणे नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिव्यात पाणीटंचाई असल्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने महिलांना पाण्यासाठी प्रसंगी मुंब्रा, ठाकुर्लीपर्यंत धाव घ्यावी लागते. ‘कॉमन मॅन’साठी लढा देणारे प्रा. अय्यर डोंबिवलीत सागावमध्ये राहतात. हे गाव महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांपैकी आहे. या गावातही पाणीटंचाई आहे. रविकिरण सोसायटीत पाणी येत नाही. तेथे पोहोच रस्ता नाही. यासाठी अय्यर यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यांनी उपोषणही केले होते. तसेच डोंबिवली ते मंत्रालय पदयात्रा केली. विमानतळाच्या विरोधासाठी डोंबिवली ते दिल्ली सायकलने प्रवास केला. अय्यर हे दिव्यातील पश्चिम भागात साऊथ इंडियन शाळा चालवतात. या शाळेत किमान एक हजार ५०० विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. या शाळेतही पाणी येत नाही. दिव्यातील पश्चिम भागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्याविरोधात अय्यर यांनी महावीर जयंतीला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत १२ तास पाण्याविना काढले. त्यांच्या सोबतीला दोन विद्यार्थीही होते. शाळेत पिण्यासाठी पाणी येत नाही. या परिसरातील महिला पाण्यासाठी मुंब्रा व ठाकुर्ली परिसरात धाव घेत आहेत. इतके भयाण चित्र दिवा परिसरात आहे. दिवा हे ठाण्याचे उपनगर आहे. पण, ठाणे महापालिका या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. १२ तास पाण्याविना आंदोलन करून अय्यर यांनी महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी त्याला थंड प्रतिसाद देत केवळ निवेदन स्वीकारले. मात्र, पाणी कधी येईल, काय केले जाईल, याविषयी आश्वासन दिले नाही. (प्रतिनिधी)