शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

१२ ‘मपोसे’ अधिकारी बनणार उपमहानिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 05:28 IST

मूळच्या उपअधीक्षक पदापासून उपायुक्त/अधीक्षक बनलेल्या राज्य पोलीस दलातील १२ अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या अधिकाºयांची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)मधील सेवाज्येष्ठता एक वर्षाने वाढविली आहे.

जमीर काझीमुंबई : मूळच्या उपअधीक्षक पदापासून उपायुक्त/अधीक्षक बनलेल्या राज्य पोलीस दलातील १२ अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या अधिकाºयांची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)मधील सेवाज्येष्ठता एक वर्षाने वाढविली आहे. आता त्यांना लवकरच उपमहानिरीक्षक/ अप्पर आयुक्त म्हणून बढती मिळणार आहे. पदोन्नती करण्याबाबतचा प्रस्ताव तयार असून, गृहविभागाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करून केंद्राकडे पाठविला जाईल.कोल्हापूरचे अधीक्षक संजय मोहिते, जळगावचे दत्ता कराळे, मुंबईतील सुप्रिया यादव, नवी मुंबईतील प्रवीण पवार यांचा त्यामध्ये समावेश आहे. अशा १२ अधिकाºयांना सध्या आयपीएसच्या २००५च्या बॅचमध्ये सामील केले होते. तथापि, केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाच्या (कॅट) आदेशानुसार, त्यांना २००४ या बॅचमध्ये सामील केले जाणार असल्याचे गृहविभागातील अतिवरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्यानंतर, त्यांना आयपीएस श्रेणी मिळण्यासाठी सुमारे १२-१३ वर्षे सेवा बजावावी लागते. भारतीय सेवेत समाविष्ठ झाल्यानंतर, तेथील ज्येष्ठतेनुसार त्यांना बढती दिले जाते. त्यानुसार, १९९२ला उपअधीक्षक म्हणून भरती झालेल्या या अधिकाºयांना २००५चे आयपीएस केडर देण्यात आले. मात्र, दरम्यानच्या कालावधीमध्ये ‘मपोसे’ कोट्यातून आवश्यक पदोन्नती न दिल्याने, काही अधिकाºयांनी याविरुद्ध ‘कॅग’मध्ये धाव घेतली. त्याला अनुकूलता दाखवित प्राधिकरणाने १९९२च्या एमपीएससी बॅचच्या अधिकाºयांना २००४चे आयपीएस केडर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानुसार, सध्या विविध घटकांमध्ये अधीक्षक, उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले हे अधिकारी ज्येष्ठतेनुसार अप्पर आयुक्त/ उपमहानिरीक्षक म्हणून बढतीसाठी पात्र ठरले आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून, येत्या काही दिवसांत होणाºया अस्थापना मंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली जाणार आहे.या अधिकाºयांना बढती...बी. जी. गायकर ,एस. बी. फुलारी, संजय मोहिते, सुनील कोल्हे, दत्ता कराळे, प्रवीण पवार, डॉ. प्रभाकर बुधवंत, सुप्रिया पाटील-यादव, ए.बी. रोकडे, डॉ. बी. जी. शेखर व संजयकुमार बाविस्कर यांची बढती होईल. याच बॅचमधील जयंत नाईकनवरे हे सध्या प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची बढती त्यांच्या कोट्यातून होईल.यांना अजूनही प्रतीक्षा...मूळसे मपोसेच्या १९९२च्या बॅचच्या अधिकाºयांना २००४ची श्रेणी मिळणार असल्याचे, आयपीएसच्या थेट २००५च्या बॅचमधील अधिकाºयांना बढतीसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. या तुकडीमध्ये ठाणे ग्रामीण व पुणे ग्रामीणचे अधीक्षक अनुक्रमे विरेश प्रभू व सुवेझ हक, मुंबईतील परिमंडळ-१ उपायुक्त मनोजकुमार शर्मा, नाशिकचे ग्रामीणचे संजय दराडे, शारदा राऊत यांचा समावेश आहे.