शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

रेल्वे बॉम्बस्फोटांप्रकरणी १२ दोषी

By admin | Updated: September 12, 2015 05:02 IST

मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले, तर पुराव्यांअभावी एका

मुंबई : मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले, तर पुराव्यांअभावी एका आरोपीची निर्दोष सुटका केली. दोषी आरोपींना काय शिक्षा ठोठवावी, यावर येत्या सोमवारपासून युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर न्यायालय या आरोपींची शिक्षा जाहीर करेल. मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वे गाड्यांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात ११ जुलै २००६ रोजी एकापाठोपाठ एक असे बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांत १८८ जणांचा बळी गेला होता, तर ८२९ जण जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर याची सुनावणीही सुरू झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१०मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवल्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर हा खटला सुरू झाला. या खटल्यात आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. (प्रतिनिधी)दोषी ...अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान.

निर्दोष ...अब्दुल शेख एटीएस व गुन्हे शाखेतील वाद... यातील सर्व १३ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा एटीएसने केला होता. मात्र जबाब देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आरोपींनी न्यायालयात केला, तर गुन्हे शाखेने २००८ मध्ये आयएमचे अतिरेकी पकडले. २००५ ते २००८ या काळात झालेले बॉम्बस्फोट आयएमनेच केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला, मात्र यात ७/११ चा उल्लेख नव्हता. त्यामुळे यंत्रणांमध्ये वाद निर्माण झाला.