शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

रेल्वे बॉम्बस्फोटांप्रकरणी १२ दोषी

By admin | Updated: September 12, 2015 05:02 IST

मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले, तर पुराव्यांअभावी एका

मुंबई : मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले, तर पुराव्यांअभावी एका आरोपीची निर्दोष सुटका केली. दोषी आरोपींना काय शिक्षा ठोठवावी, यावर येत्या सोमवारपासून युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर न्यायालय या आरोपींची शिक्षा जाहीर करेल. मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वे गाड्यांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात ११ जुलै २००६ रोजी एकापाठोपाठ एक असे बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांत १८८ जणांचा बळी गेला होता, तर ८२९ जण जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर याची सुनावणीही सुरू झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१०मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवल्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर हा खटला सुरू झाला. या खटल्यात आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. (प्रतिनिधी)दोषी ...अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान.

निर्दोष ...अब्दुल शेख एटीएस व गुन्हे शाखेतील वाद... यातील सर्व १३ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा एटीएसने केला होता. मात्र जबाब देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आरोपींनी न्यायालयात केला, तर गुन्हे शाखेने २००८ मध्ये आयएमचे अतिरेकी पकडले. २००५ ते २००८ या काळात झालेले बॉम्बस्फोट आयएमनेच केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला, मात्र यात ७/११ चा उल्लेख नव्हता. त्यामुळे यंत्रणांमध्ये वाद निर्माण झाला.