शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून ११७ मुली घरातून ‘पळाल्या’

By admin | Updated: June 13, 2016 01:25 IST

मे महिन्यात पुणे जिल्ह्यातून ३९ अल्पवयीन, तर १८ ते २५ वयोगटांतील ७८ अशा एकूण ११७ मुली घरातून पळून गेल्या असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले

लोणी काळभोर : मे महिन्यात पुणे जिल्ह्यातून ३९ अल्पवयीन, तर १८ ते २५ वयोगटांतील ७८ अशा एकूण ११७ मुली घरातून पळून गेल्या असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आढावा घेतला असता, खेड तालुक्यातून सर्वांत जास्त ९ मुली पळून गेल्या आहेत, तर लोणावळा ग्रामीणमधून ५ मुली पळून गेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यातून उर्वरित मुली घर सोडून पळून गेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये हे प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आणि प्रत्यक्ष आकडेवारी सांगत आहे. नुकत्याच गाजत असलेल्या चित्रपटांचा हा प्रभाव का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी 'लोकमत'ला याविषयीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की पुणे जिल्ह्यातून मे महिन्यात ३९ अल्पवयीन मुली गायब झाल्या होत्या. त्यापैकी १६ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यातील बहुतांश मुली या १८ ते २५ वयोगटांतील आहेत. अशा ७८ पैकी २३ मुलींना घरी परत आणण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. ही जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार प्राप्त झालेली आकडेवारी आहे. मात्र, लोक लज्जेपोटी तक्रार न देता शोधत राहणाऱ्या पालकांचेही प्रमाण असू शकते, असा पोलिसांचा दावा आहे. लोणी काळभोरमध्येही अशा काही घटना घडल्या होत्या; परंतु त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार देण्यास मात्र ते धजावलेले नव्हते. >मुलांशी पालकांनी मैैत्री करावीया वाढत्या प्रकारांमुळे पालकवर्ग मात्र काळजीने ग्रासला आहे. हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर म्हणाल्या की, हा केवळ चित्रपटाचा परिणाम नाही. याबाबतीत पालकांचे दुर्लक्ष अधिक कारणीभूत आहे. मुले वयात आल्यानंतर बाहेर काय करतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण? या बाबतीत लक्ष दिले जात नाही. मोबाईल अथवा टीव्हीमुळे या गोष्टींना चालना मिळते, हे सत्य असले, तरीही आपण या गोष्टींपासून त्यांना दूर ठेवू शकत नाही. पालकांचे संस्कारही महत्त्वाचे आहेत म्हणूनच मुले वयात येताना, त्यांच्याशी पालकांनीच मैत्री करणे गरजेचे आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. टीव्हीवरील शेकडो चॅनेलवरील वेगवेगळ्या चित्रपटांच्या भडिमारांमुळे मुले तसे करू पाहतात. त्यातच मोबाईलमुळे संपर्क सहजसोपा झाला आहे.