शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

जिल्ह्यातून ११७ मुली घरातून ‘पळाल्या’

By admin | Updated: June 13, 2016 01:25 IST

मे महिन्यात पुणे जिल्ह्यातून ३९ अल्पवयीन, तर १८ ते २५ वयोगटांतील ७८ अशा एकूण ११७ मुली घरातून पळून गेल्या असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले

लोणी काळभोर : मे महिन्यात पुणे जिल्ह्यातून ३९ अल्पवयीन, तर १८ ते २५ वयोगटांतील ७८ अशा एकूण ११७ मुली घरातून पळून गेल्या असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आढावा घेतला असता, खेड तालुक्यातून सर्वांत जास्त ९ मुली पळून गेल्या आहेत, तर लोणावळा ग्रामीणमधून ५ मुली पळून गेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यातून उर्वरित मुली घर सोडून पळून गेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये हे प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आणि प्रत्यक्ष आकडेवारी सांगत आहे. नुकत्याच गाजत असलेल्या चित्रपटांचा हा प्रभाव का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी 'लोकमत'ला याविषयीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की पुणे जिल्ह्यातून मे महिन्यात ३९ अल्पवयीन मुली गायब झाल्या होत्या. त्यापैकी १६ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यातील बहुतांश मुली या १८ ते २५ वयोगटांतील आहेत. अशा ७८ पैकी २३ मुलींना घरी परत आणण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. ही जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार प्राप्त झालेली आकडेवारी आहे. मात्र, लोक लज्जेपोटी तक्रार न देता शोधत राहणाऱ्या पालकांचेही प्रमाण असू शकते, असा पोलिसांचा दावा आहे. लोणी काळभोरमध्येही अशा काही घटना घडल्या होत्या; परंतु त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार देण्यास मात्र ते धजावलेले नव्हते. >मुलांशी पालकांनी मैैत्री करावीया वाढत्या प्रकारांमुळे पालकवर्ग मात्र काळजीने ग्रासला आहे. हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर म्हणाल्या की, हा केवळ चित्रपटाचा परिणाम नाही. याबाबतीत पालकांचे दुर्लक्ष अधिक कारणीभूत आहे. मुले वयात आल्यानंतर बाहेर काय करतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण? या बाबतीत लक्ष दिले जात नाही. मोबाईल अथवा टीव्हीमुळे या गोष्टींना चालना मिळते, हे सत्य असले, तरीही आपण या गोष्टींपासून त्यांना दूर ठेवू शकत नाही. पालकांचे संस्कारही महत्त्वाचे आहेत म्हणूनच मुले वयात येताना, त्यांच्याशी पालकांनीच मैत्री करणे गरजेचे आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. टीव्हीवरील शेकडो चॅनेलवरील वेगवेगळ्या चित्रपटांच्या भडिमारांमुळे मुले तसे करू पाहतात. त्यातच मोबाईलमुळे संपर्क सहजसोपा झाला आहे.