शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

सात महिन्यांत ११६५ बालमृत्यू

By admin | Updated: December 5, 2014 00:46 IST

पूर्वीच्या तुलनेत बालमृत्यू आणि माता मृत्युदरात घट झाली, हे काही अंशी खरे आहे; परंतु हे मृत्यू रोखण्यात पाहिजे त्या प्रमाणात शासनाला यश आले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य सेवा, नागपूर मंडळांतर्गत

मुलांची संख्या ६४२ तर मुली ५२३ सुमेध वाघमारे - नागपूरपूर्वीच्या तुलनेत बालमृत्यू आणि माता मृत्युदरात घट झाली, हे काही अंशी खरे आहे; परंतु हे मृत्यू रोखण्यात पाहिजे त्या प्रमाणात शासनाला यश आले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य सेवा, नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यात मागील सात महिन्यांत पाच वर्षाखालील ११६५ बालकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, एक ते सात दिवसांच्या कालावधीतील बालकांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण २०१३मध्ये भारतात सर्वाधिक म्हणजेच सुमारे १.३४ दशलक्ष इतके राहिले आहे. १९९० मध्ये बालकांच्या मृत्यूचे प्रमाण ३.३३ दशलक्ष इतके होते. त्या तुलनेत २०१३ मध्ये हेच प्रमाण १.३४ दशलक्ष इतके कमी झाले आहे. १९९० ते २०१३ दरम्यान मृत्यूदरात मोठी घट झाली असली तरी जन्मदरातही तितक्याच मोठ्या प्रमाणात घट झाली. १९९० मध्ये जन्मदर एक हजारामागे ८८ इतका होता हेच प्रमाण २०१३मध्ये ४१ इतके कमी झाले आहे. यामध्ये १७ टक्के बालकांचे मृत्यू हे मुदतपूर्व प्रसूती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुतीमुळे होतात तर १५ टक्के बालकांचे मृत्यू न्यूमोनियामुळे, ११ टक्के मृत्यू प्रसूतीदरम्यान, नऊ टक्के बालकांचे मृत्यू अतिसार, तर सात टक्के बालकांचे मृत्यू हे मलेरियामुळे होतात. महाराष्ट्रात बालमृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम), जननी सुरक्षा अभियान कार्यान्वित असतानाही अपेक्षित यश मिळत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरोग्य सेवा मंडळ, नागपूर अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यामध्ये एप्रिल ते आॅक्टोबर यादरम्यान पाच वर्षांखालील एकूण १ हजार १६५ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात मुलिंची संख्या ५२३ असून मुलांची संख्या ६४२ आहे. यामुळे या जिल्ह्यात बालमृत्यूवर आणखी काम होणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.-एक ते सात दिवसांच्या अर्भक मृत्यूची संख्या मोठीपाच वर्षाखालील बालकांमध्ये एक ते सात दिवसांच्या अर्भकांची संख्या मोठी आहे. मागील सात महिन्यात सहाही जिल्ह्यात या कालावधीत ३४२ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात २०७ मुले तर १३५ मुली आहेत. गोंदियात १३१, भंडाऱ्यात ६७, वर्धेत ६१, चंद्रपूरमध्ये ३२, गडचिरोलीत ३० तर सर्वात कमी नागपूर जिल्ह्यात २१ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीत आॅक्टोबर महिन्यात बालमृत्यूच नाहीआॅक्टोबर-२०१४मध्ये इतर सहा जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोलीत बालमृत्यूची नोंदच झालेली नाही. इतर पाच जिल्ह्यांमध्ये २०६ बालकांची नोंद आहे. यात सर्वात जास्त गोंदिया ६७, भंडाऱ्यात ५२, नागपुरात ३१, चंद्रपूरमध्ये २९ तर वर्धेत २७ बालमृत्यूची नोंद आहे.