शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

तीन महिन्यात ११६ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 26, 2016 17:29 IST

गेल्या तीन महिन्यात म्हणजेच २०१६ मध्ये मिळालेल्या माहितीनुसार नापिकीमुळे जवळजवळ ११६ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये देशभरात

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - २०१६च्या पहिल्या ३ महिन्यात दुष्काळाची तिव्रता आधिक भीषण झाली असून या दरम्यान शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.   या ३ महिन्यात नापिकीमुळे ११६ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये देशभरात सर्वाधिक जास्त आत्महत्याचे प्रमाण महाराष्ट्रातआहे, त्यानंतर पंजाब व तेलंगणा राज्यांमध्ये झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे. 
 
नापिकीमुळेच गेल्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये २,००० शेतक-यांनी आत्महत्या केली होती. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रात १,८४१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. 
 
गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात ५७ शेतक-यांनी आत्महत्या केली.तर पंजाबमध्ये ५६ आणि तेलंगणमध्ये तीन शेतमजूरांनी आत्महत्या केली असल्याची माहिती रेकॉर्डला असल्याचे केंद्रीय कृषी राज्य मंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी लोकसभेत सांगितले. 
 
देशातील अनेक राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती ओढावली असून यामध्ये कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तेलंगण, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, झारखंड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.