शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

माध्यान्ह भोजनाची ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा; २ गंभीर

By admin | Updated: January 4, 2015 02:46 IST

तालुक्याच्या कोर्टी येथील शिवाजी विद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली.

सोलापुरातील घटनाकरमाळा (सोलापूर) : तालुक्याच्या कोर्टी येथील शिवाजी विद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. त्यापैकी ६४ जणांवर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात तर ४९ जणांवर कोर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माध्यान्ह भोजनाचा शिजवलेला भात खाल्ल्याने तब्बल ११५ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. मुख्याध्यापक छगन माने व इतर शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना तातडीने कोर्टीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे सर्वच विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर ६६ विद्यार्थ्यांना उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. (वार्ताहर)च्कोर्टी येथील शिवाजी विद्यालयात सकाळी शिजवलेल्या भाताचा कुबट वास येत असल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले होते, पण याकडे कोणी लक्ष दिले नाही, असे सांगितले गेले.च्शालेय पोषण आहार निकृष्ट असल्याचा व विद्यालयाच्या संस्थेत पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट असल्याने हा प्रकार झाला असावा, असा बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांचा सूर होता.