शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ११०० सुरक्षारक्षक

By admin | Updated: March 24, 2017 01:53 IST

संपकरी डॉक्टरांनंतर उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारलाही डॉक्टरांच्या सुरक्षेवरून फैलावर घेतले.

मुंबई : संपकरी डॉक्टरांनंतर उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारलाही डॉक्टरांच्या सुरक्षेवरून फैलावर घेतले. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी वेळीच पावले उचलली असती तर आज ही स्थिती ओढावली नसती, असे म्हणत न्यायालयाने राज्य सरकारला ५ एप्रिलपर्यंत मुंबईतील सरकारी रुग्णालयांत ५०० सुरक्षारक्षक नेमण्याचे निर्देश दिले. सोबतच डॉक्टरांना कर्तव्याची जाणीव करून देत तातडीने सेवेत रुजू होण्याचा आदेश दिला. राज्यातील वेगवेगळ्या भागांतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील जवळपास ४,००० डॉक्टरांनी संप पुकारला. संपाविरुद्ध अफाक मांडविया यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. ‘कधी कधी डॉक्टरांना भयंकर परिस्थितीत काम करावे लागते, हे आम्हाला माहीत आहे. तरी आम्ही सर्व डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी लगेचच सेवेत रुजू व्हावे,’ असे खंडपीठाने म्हटले. महाअधिवक्ता रोहित देव यांनी ४००० डॉक्टरांपैकी केवळ ९० ते ९२ डॉक्टर सेवेत रुजू झाल्याची माहिती दिली. ‘रुग्णालय सुरक्षा लेखापरीक्षण केले असून ५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे ५०० सुरक्षारक्षक रुग्णालयात नेमण्यात येतील. उर्वरित ६०० सुरक्षारक्षक ३० एप्रिलपर्यंत नेमण्यात येतील. प्रत्येक रुग्णालयात रुग्णाला भेटण्यास दोनच नातेवाईक जाऊ शकतील. या अटीचे पालन काटेकोरपणे केले जाईल,’ असे देव यांनी खंडपीठाला सांगितले.मात्र, उच्च न्यायालयाने त्याबाबत असमाधान व्यक्त केले. सरकारने एवढ्या उपाययोजना आखल्या आहेत, तरी एवढे लोक हल्ला करतात कसा? कोणाची चूक? त्यासाठी या लोकांचा (डॉक्टर) जीव धोक्यात का घालायचा? आजची स्थिती केवळ एका घटनेमुळे निर्माण झालेली नाही. ते मागण्या मान्य करण्यासाठी ओरडत राहिले, त्यांना काहीच न मिळाल्याने ही स्थिती ओढावली. राज्य सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उच्च न्यायालयाला दिलेले आश्वासन पाळले असते, तर आज हे चित्र नसते, अशा शब्दांत खंडपीठाने सरकारला सुनावले. तसेच मार्ड उच्च न्यायालयात येऊ शकली असती. एवढा प्रसंग येण्याची वाट का पाहिली, असा प्रश्नही मार्डला केला. ‘रुग्ण व नातेवाइकांना उपचारासाठी ताटकळत राहिल्याचे पाहणे, वेदनादायी आहे. तुमच्या नातेवाइकांवर अशी स्थिती ओढावली तर, असा प्रश्न खंडपीठाने केला. मार्डच्या वकिलांनी सेवेत रुजू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील पुढील सुनावणी ६ एप्रिलला ठेवली. (प्रतिनिधी)