शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

राज्यात ११ टेक्सटाईल्स पार्क उभारणार

By admin | Updated: January 12, 2016 02:07 IST

जेथे शेतमाल पिकतो तेथेच प्रक्रिया उद्योग उभारला जावा. विदर्भ व मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापसापासून कापडापर्यंत उद्योग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठीे

जालना : जेथे शेतमाल पिकतो तेथेच प्रक्रिया उद्योग उभारला जावा. विदर्भ व मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापसापासून कापडापर्यंत उद्योग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठीे राज्यात ११ टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी विदर्भात ६ व मराठवाड्यात ५ असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. जालनामध्ये आयोजित पीक प्रात्यक्षिक व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मध्यप्रदेशातील कृषी विकास दर वाढीचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, केवळ शेततळ्यांमुळेच हे राज्य ३४ टक्के कृषी विकास दर गाठू शकले. यानंतर मागेल त्याला शेततळे देण्याची योजना राज्य सरकारची असून, आगामी पाच वर्षांत पाच लाख शेततळे उभारण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.राज्यात ८२ टक्के शेती कोरडवाहू असून, शाश्वत शेतीसाठी या क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. त्यासाठी सरकारने वीज, पाणी, बियाणे या सुविधांसाठी गतवर्षी ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यंदा ५ हजार कोटींची करणार असल्याचे मुख्यमंत्रीे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)- पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, तसेच जलसाठांच्या विकेंद्रीकरणसाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली.- पाच वर्षांत २० हजार गावांत ही योजना राबविली जाणार असून याचे चांगले परिणाम दिसून येत आहे. - एकाच वर्षात २४ टीएमसी पाणी साठवले गेले असून १४०० कोटी रुपयांचा खर्च झाला. त्यातील ४०० कोटी रुपये शेतकरी आणि सर्वसामान्यांनी दिले आहेत.