शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
6
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
7
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
8
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
9
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
10
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
11
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
12
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
13
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
14
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
15
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
16
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
17
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
18
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
19
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
20
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   

११ कोटी जनतेला कमी दरात वीज देणार !

By admin | Updated: April 23, 2015 05:46 IST

राज्यातील विजेची मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधण्यासह भारनियमन कमी करण्यासाठी आणि ग्राहकसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी फिडर फ्रॅन्चायझी

मुंबई : राज्यातील विजेची मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधण्यासह भारनियमन कमी करण्यासाठी आणि ग्राहकसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी फिडर फ्रॅन्चायझी व्यवस्थापक योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. वीजगळती रोखणे, उच्च दर्जाचा कोळसा पुरविणे, कोळसा वाहतूक खर्चावरील खर्चात कपात करणे आणि ग्लोबल टेंडर मागविणे अशा माध्यमातून भविष्यात राज्यातील सुमारे ११ कोटी जनतेला कमी दरात वीज देण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.वीजनिर्मितीचा खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी कामगिरीत सुधारणात्मक उपाययोजना या विषयावर महानिर्मितीतर्फे वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले की, आजघडीला महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांवर ५५ हजार कोटींचे कर्ज आहे. शिवाय कंपनीच्यावीजहानी आणि वीजगळतीचा गंभीर प्रश्न आहे. मात्र या सर्व प्रश्नांवर मात करण्यासाठी ऊर्जा विभाग सक्षम आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी वीज कंपन्यांचे वीजदर खासगी क्षेत्रातील वीज कंपन्यांच्या स्तरावर यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून ऊर्जा बचत धोरणाचा विचार केला जात आहे. ऊर्जा प्रकल्पाला तीन वर्षे विलंब झाल्याने परळीसह उर्वरित वीजनिर्मितीचे दोन संच बंद आहेत. परंतु आता तेही पूर्णवेळ सुरू करण्यात येणार आहेत. विदर्भातील वेस्टर्न कोस्टल कंपनीकडून २३ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा पुरविण्यात येणार असून, यामुळे वीजनिर्मितीला आणखी चालना मिळेल. शिवाय २०२० ते २०३५ पर्यंत ५ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. जुन्या संचाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ केली जाणार असून, वीजचोरी टाळण्यासाठी सोशल इंजिनीअरिंगवर भर दिला जाणार आहे. बेरोजगार अभियंत्यांना कामे देण्यात येणार असून, कामांचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जाईल. भविष्यात फिडर अकाउंटिलिबिटी आणण्यात येणार असून, साहजिकच या माध्यमातून वीजचोरीसह वीजहानीला आळा घालण्यात येणार आहे. वीजहानी कमी करून त्यातून जो पैसा उभा राहील, तो विजेचे दर कमी करण्यासाठी वापरला जाईल. राज्यातील १२ हजार गावांना शेतीपंपांपासून वेगळे करायचे असून, फिडर सेप्रेशन झाले की साहजिकच १८ हजार गावे भारनियमनमुक्त होणार आहेत. राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पुढील तीन महिन्यांत ७ हजार ५०० सौरपंप वितरीत करण्यात येणार आहेत. पावसाळ्याचे दिवस वगळता उर्वरित ३१० दिवस ते सुरू राहतील. राज्यातील वीज ग्राहकांना भविष्यात वीजदरवाढीचे चटके बसू नयेत, म्हणून गतवर्षी लागू झालेली २० टक्के दरवाढ स्थिर ठेवण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे बावनकुळे यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)