शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र

By admin | Updated: August 31, 2016 07:22 IST

विद्यार्थ्यांच्या कोवळ्या हळूवार मनाची तितक्याच कोमलपणे दखल घेणाऱ्या माननीय शिक्षणमंत्र्यांनी आणखी एक स्तुत्य उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले आहे.

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
 
विद्यार्थ्यांच्या कोवळ्या हळूवार मनाची तितक्याच कोमलपणे दखल घेणाऱ्या माननीय शिक्षणमंत्र्यांनी आणखी एक स्तुत्य उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले आहे. मूल जन्माला आलं की महापालिकेच्या जन्मदाखल्यासोबतच, मुलाच्या 16व्या वाढदिवसाच्या तारखेचं दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.
 
जुलै-ऑगस्ट, २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत तीन किंवा तीन पेक्षा अधिक विषयात अनूत्तीर्ण विद्यार्थी हे कौशल्य विकास सेतू कार्यक्रमासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकही गुणपत्रिकेवर नापास हा शिक्का राहणार नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी मंगळवारी घोषित केले.
 
त्यानंतर अनौपचारीक वार्तालाप करताना शिक्षणमंत्र्यांनी यापुढचं पाऊल आणखी दमदार असल्याचे सूचित केले. दहावीला नापास होणार नाही याची तर हमी मिळाली, परंतु दहावीपर्यंत पोहोचू का? शाळेत जायला जमेल का? गेलोच आणि सैराट होत आर्ची-परश्या झालो तर शैक्षणिक नुकसान होईल का? हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर, पुढील काळात येण्याची शक्यता आहे. या अडचणींचा विचार करून जन्मदाखल्यासोबतच दहावीचं प्रमाणपत्र दिलं, तर विद्यार्थी अत्यंत निर्धोकपणे त्यांचं बालजीवन कृष्णलीला करत रमतगमत घालवू शकतील असा यामागचा विचार आहे.
 
यावरच न थांबता, शिक्षणमंत्री देशभरातल्या विविध विद्यापीठांशी आणि कंपन्यांशी टाय अप करण्याचा प्रयत्न करत असून पदवीचं शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण व कँपस इंटरव्यूची सोय मुलाच्या जन्माच्यावेळीच करता येईल का याची चाचपणी करत आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तंत्रज्ञानाच्या वापराचा मंत्र त्यासाठी उपयोगाला येईल असा शिक्षणमंत्र्यांना विश्वास आहे. उगाच शैक्षणिक अभ्यासक्रमाचे उंबरठे झिजवण्यापेक्षा मुलाची डीएनए टेस्ट करून तो मोठेपणी कोण होईल हे ठरवता येणं आणि त्या अनुषंगानं पदव्या व नोकरीचं वाटपही जन्मदाखल्यासोबतच करता येईल अशी त्यांची अटकळ आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला शहाणं करून सोडणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा आदर्श शिक्षणमंत्र्यांच्या डोळ्यासमोर आहेच. विश्वाचं सार सांगणारी ज्ञानेश्वरी लिहून अवघ्या सोळाव्या वर्षी समाधी घेणाऱ्या ज्ञानेश्वरांना डिग्रीची अडचण भासली नाही, तर आपल्याला का भासावी असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला असून, हा विषय याच टर्ममध्ये मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे.
 
(ही वात्रटिका असून कृपया खरी बातमी समजू नये)