शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायती ‘बेघर’

By admin | Updated: November 12, 2014 23:33 IST

राजकीय उदासीनता कारणीभूत : नियोजनबध्द आराखडा नाही

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -स्वातंत्र्याच्या साठीनंतर जिल्ह्यातील १०६ ग्रामंपंचायती स्वत:च्या मालकीची इमारत नसल्यामुळे हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित आहेत. याशिवाय २०१३-१४ मध्ये ३१ गावांना ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर केला आहे. यातील बहुतांश इमारतीच्या कामाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी लाखांच्या घरात खर्च केला जातो; मात्र ग्रामपंचायतीला हक्काची इमारत असावी, यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात एकूण १०२९ ग्रामपंचायती आहेत. गावात मूलभूत सुविधा देणे ही मुख्य जबाबदारी ग्रामपंचायतीची आहेत. अलीकडे ग्रामपंचायतीला जादा अधिकार दिले जात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायतीतर्फे राबविल्या जातात. केंद्र व राज्याकडून थेट आॅनलाईनवर ग्रामपंचायतीच्या खात्यावर निधी जमा केला जात आहे. यामुळे राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला महत्त्व आहे.राजकीयदृष्ट्या संवेदशील आणि गावपातळीवरील लोकप्रतिनिधी सतर्क असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या इमारती पाच ते दहा वर्षांपूर्वीच झालेल्या आहेत. लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा, आमदार, खासदार, प्रसंगी मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्याकडे पाठ फिरविलेल्यांच्या गावात अजूनही ग्रामपंचायतीला इमारत नाही. प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी उद्दिष्ट शासनाकडून येते. त्यानुसार लोकप्रतिनिधीकडून निवडलेल्या गावांना निधी दिला जातो. इमारत नसलेल्या गावांपैकी काही गावांना पुढील वर्षी निधी मिळेल. - एम. एस. घुले (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत)