शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

जलपरीच्या १०१ फेऱ्या; लातूरला पुरविले २३ कोटी लिटर पाणी

By admin | Updated: July 29, 2016 19:40 IST

लातूर शहरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने मिरजहून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ १२ एप्रिलपासून या जलपरीची सेवा

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. २९ : लातूर शहरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने मिरजहून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ १२ एप्रिलपासून या जलपरीची सेवा असून, आतापर्यंत १०१ फेऱ्या झाल्या असून, २३ कोटी ४५ लाख लिटर पाणी जलपरीने लातूरकरांना पुरविले आहे़

लातूर शहरात मागील चार महिन्यांपासून अभूतपूर्व पाणीटंचाई आहे़ अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत कोरडे आहेत़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातही पाण्याचा साठा झालेला नाही़ रेल्वे तसेच बेलकुंड, माकणी, डोंगरगाव येथून टँकरद्वारे पाणी आणून शहरात पुरवठा करण्यात आला़ मात्र सर्वाधिक मदद होत आहे ते रेल्वेच्या पाण्याची़ १२ एप्रिल रोजी जलपरीची पहिली फेरी झाली़ १० वॅगनद्वारे ५ लाख लिटर पाणी आणण्यात आले़ १२ ते १९ एप्रिलपर्यंत जलपरीच्या १० वॅगनच्या ९ फेऱ्या झाल्या़ २० एप्रिलपासून दररोज ५० वॅगनद्वारे २५ लाख लिटर पाणी आणले जात आहे़ ५० वॅगनच्या ९२ फेऱ्या झाल्या आहेत़ आतापर्यंत या जलपरीने २३ कोटी ४५ लाख लिटर पाणी आणले असून, या पाण्यावर लातूरकरांची तहान भागविली जात आहे़

गेल्या तीन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत असला तरी जमिनी बाहेर पाणी आले नाही़ त्यामुळे प्रकल्प कोरडे आहेत़ मध्यम प्रकल्पासह लघू प्रकल्पांतही पाणीसाठा झालेला नाही़ आतापर्यंत ३४० मिमी पेक्षा अधिक पाऊस होवूनही पाणी जमिनी बाहेर आले नाही़ त्यामुळे जलपरीची सेवा आॅगस्टपर्यंत सुरू ठेवण्यास रेल्वे प्रशासनाने सहमती दिली आहे़ जलपरीचा आधार लातूरकरांना मिळाल्यामुळे पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता आली़ जलपरीचे दररोज २५ लाख आणि स्थानिक स्त्रोतातील ४५ ते ५० लाख लिटर असे एकूण ७० ते ७५ लाख लिटर पाणी महानगरपालिकेच्या वतीने टँकरद्वारे वाटप करण्यात येत आहे़.

 जुलै महिन्याच्या प्रारंभी तीन दिवस तांत्रिक अडचणीमुळे जलपरीची सेवा खंडित झाली होती़ त्यावेळी मनपा प्रशासन हतबल झाले होते़ तीन दिवसाच्या खंडानंतर जलपरीची सेवा सुरू झाल्यास मनपा प्रशासनाला दिलासा मिळाला़ आता पावसाळ्यातही जलपरीचाच आधार आहे़

मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४५ मिमी पाऊस झाला असला तरी प्रकल्प कोरडा आहे़ प्रकल्पाच्या वरच्या बाजूला लोहटा व खडकी शिवारात मांजरा नदीपात्रात काही प्रमाणात पाणी आले आहे़ मात्र त्या प्रवाह धरण पात्रात आलेला नाही़ धरण पात्रात थोडाही संचय नाही़ तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस प्रकल्प क्षेत्रात झाला तर पाण्याचा संचय होण्यास मदत होईल, असे मांजरा प्रकल्पाचे शाखा अभियंता अनिल मुळे यांनी सांगितले़