शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
3
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
4
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
5
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
6
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
7
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
9
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
10
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
11
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
12
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
13
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
14
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
15
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
16
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
17
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
18
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
19
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
20
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

आत्मक्लेश पदयात्रेसाठी सांगलीतून 10000 भाकरी

By admin | Updated: May 24, 2017 21:39 IST

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेत सांगली, कोल्हापूर येथील शेतक-यांसह राज्यातील शेतकरीही

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 24 - खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेत सांगली, कोल्हापूर येथील शेतक-यांसह राज्यातील शेतकरीही हजारोच्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी १० हजार भाकरी व खरडा जमविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार दि. 25 रोजी अंकलखोप (ता. पलूस) येथून पाच हजार आणि दि. २६ रोजी नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी पाच हजार भाकरी पाठविणार आहेत.
पदयात्रेत सांगली जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले, भास्कर कदम, भरत चौगुले, वैभव चौगुले, संदीप राजोबा, सुदर्शन वाडकर, सचिन डांगे, विनायक जाधव, बाबा सांद्रे, पोपट मोरे, अशोक खाडे, शिवाजी पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
सर्व शेतकºयांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली पाहिजे, साखरेचे दर वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना दुसरा हप्ता ५०० रुपये मिळाला पाहिजे, स्वामीनाथन् आयोगाच्या  शिफारशी लागू कराव्यात, मायक्रोफायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी यांसह अन्य मागण्यांसाठी आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे.
 
सोमवार दि. २२ पासून पुणे येथून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. बुधवार दि. २४ रोजी आत्मक्लेष पदयात्रेचा मुक्काम वाकसई (ता. मावळ, जि. पुणे) येथील संत तुकाराम महाराज पादुका वृक्ष येथे होता.
गुरूवार दि. २५ रोजी खोपोली (जि. रायगड) येथे मुक्काम आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथील शेतकरी पाच हजार भाकरी व खरडा पाठविणार आहेत, तर दि. २६ रोजी नांद्रे येथील शेतकरी पाच हजार भाकरी व खरडा पाठविणार आहेत. प्रत्येक शेतकºयाच्या घरातून, अशा भाकरी आणि खरडा जमविण्याचे नियोजन आहे. पदयात्रेतील कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी दि. ३० तारखेपर्यंत मिरज तालुक्यातील दुधगाव, समडोळी, तुंग, कवठेएकंद, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, मालगाव, बेडग, आरग, म्हैसाळ, पलूस तालुक्यातील शेतकरी रोज भाकरी व खरडा पाठविणार आहेत, असेही महावीर पाटील यांनी सांगितले.
 
पुणे, मुंबईतील ससांगलीकरांचा आंदोलनात सहभाग-
मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले जे नागरिक पुणे, ठाणे, मुंबई आणि अन्य शहरांच्या परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त राहतात, तेथील हजारो नागरिक शिदोरीसह आंदोलनात बुधवारी सहभागी झाले. कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असल्यामुळे पदयात्रा निश्चितच यशस्वी होणार असून आंदोलनापुढे सरकारला झुकावेच लागेल, असे महावीर पाटील यांनी सांगितले.