शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मुंबई विद्यापीठ उभारणार १ हजार कोटी रुपये

By admin | Updated: July 15, 2016 22:07 IST

मुंबई विद्यापीठाच्या १६०व्या वर्धापन दिनानिमित्त एक हजार कोटी रुपये उभे करण्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केली आहे.

चेतन ननावरे/ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 - मुंबई विद्यापीठाच्या १६०व्या वर्धापन दिनानिमित्त एक हजार कोटी रुपये उभे करण्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केली आहे. या पैशांतून विद्यार्थ्यांसाठी १ हजार ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह, शिक्षकांसाठी २५० घरे अशा विविध योजना राबवणार असल्याचेही देशमुख यांनी ह्यलोकमतह्णला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.देशमुख म्हणाले की, मुंबई विद्यापीठात केवळ राज्य आणि देशातूनच नव्हे, तर परदेशातील विद्यार्थिही शिक्षणासाठी येतात. मात्र त्यांच्यासाठी आवश्यक वसतीगृह विद्यापीठाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इच्छा असतानाही विद्यापीठात प्रवेश निश्चित करता येत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी भाड्याने जागा घेऊन राहणे, विद्यार्थ्यांसाठी कठीण असते. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सुमारे १ हजार ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे चांगले विद्यार्थिही विद्यापीठाकडे आकर्षित होतील. आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल. दर्जेदार शिक्षकांची वाढ व्हावी, म्हणून विद्यापीठातर्फे शिक्षकांसाठी घरांची व्यवस्था करण्याची घोषणाही देशमुख यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, सुमारे २५० शिक्षकांसाठी घरे उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.याशिवाय विद्यापीठाचे स्वत:चे मालकीचे अतिथीगृह तयार करण्याची संकल्पनाही तयार आहे. किमान ५० अतिथींना त्यात राहण्याची व्यवस्था केली जाईल. याबाबत सविस्तर माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान, विज्ञान भवनाची अष्टभुजा असलेली एक वास्तू तयार करण्याचे स्वप्नही कुलगुरूंनी व्यक्त केले. या वास्तूत सर्व शाखांची चर्चा करता येईल, असेही त्यांनी सांगितले. सोबतच विद्यापीठाच्या मालकीचे एक संग्रहालय तयार करून गेल्या १६० वर्षांतील अमूल्य दस्ताऐवज आणि ठेवा जतन करण्याचा विचार प्रत्यक्षात साकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले................................विद्यापीठाच्या नावाला लौकीक अशा वास्तू उभारल्यास नक्कीच दर्जेदार विद्यार्थी आणि शिक्षक विद्यापीठाकडे आकर्षित होतील, अशी खात्री कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. या वास्तूंसाठी आवश्यक सर्व पैसा उभा करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाकडे इतकी मोठी रक्कम उभी करण्याची क्षमता असून, विद्यापीठ मालकीची कोणतीही जमीन न विकता या गोष्टी निर्माण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.