शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दुष्काळात एसटीला १00 कोटींची झळ

By admin | Updated: July 4, 2016 05:10 IST

दुष्काळाच्या झळांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील रहिवाशांनी गेल्या सहा महिन्यांत एसटीने प्रवास करणेच टाळल्याने एसटीचे भारमान घसरले

मुंबई : दुष्काळाच्या झळांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील रहिवाशांनी गेल्या सहा महिन्यांत एसटीने प्रवास करणेच टाळल्याने एसटीचे भारमान घसरले आहे. त्यामुळे महामंडळाला तब्बल १00 कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाकडून दुष्काळग्रस्त भागांत यापुढे जास्तीतजास्त प्रवासी मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पाण्याअभावी त्रस्त झालेल्या अनेकांनी स्थानिक पातळीवरचा आणि लांबचा प्रवास टाळला. याचा फटका एसटी सेवांना बसू लागला. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात तर एसटीची स्थिती फारच बिकट झाली. बसेस आगार आणि स्थानकांत उभ्याच करून ठेवण्यात येत होत्या. एसटीचे भारमान घटत गेले आणि उत्पन्नावरही त्याचा परिणाम होऊ लागला. जानेवारी ते मार्चदरम्यान दुष्काळामुळे एसटीला ३१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. एप्रिल महिन्यात लग्नसराईमुळे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा एसटी महामंडळाला होती. मात्र तसे झाले नाही. एप्रिल ते जूनदरम्यान उत्पन्न तब्बल ८४ कोटी रुपयांनी घटले. एप्रिल ते जून २०१५ या कालावधीशी तुलना केल्यास हे उत्पन्न फारच कमी असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. एकूणच जानेवारी ते जूनदरम्यान एसटीला १00 कोटींपेक्षा जास्त फटका बसला. सहा महिन्यांत एवढा मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाकडून आता नव्या उपाययोजना शोधण्यात येत आहेत. ज्या भागात दुष्काळामुळे फटका बसला त्या भागातून जास्तीतजास्त प्रवासी आणि उत्पन्न कसे मिळविता येईल, यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)>लग्नसराईत ३९ कोटी३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी लग्नसराई जास्त असल्याने त्याचा फायदा घेत एसटीने जादा वाहतूक केली आणि जवळपास ३९ कोटी ४0 लाखांचे उत्पन्न मिळवले. मात्र मे महिना सुरूहोताच भारमान पुन्हा घसरत गेले. त्यामुळे उत्पन्न मिळवूनही त्याचा फारसा फायदा एसटीला झाला नाही. दुष्काळामुळे एसटीचे भारमान घसरले आहे आणि मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. त्यामुळे यापुढे अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. - रणजीतसिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ सुरुवातीच्या तीन महिन्यांत ३१ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाल्याने जूनपर्यंत हा आकडा १00 कोटी पार करेल, असा अंदाज एसटी महामंडळाकडून आधीच वर्तविण्यात येत होता.