शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात एसटीला १00 कोटींची झळ

By admin | Updated: July 4, 2016 05:10 IST

दुष्काळाच्या झळांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील रहिवाशांनी गेल्या सहा महिन्यांत एसटीने प्रवास करणेच टाळल्याने एसटीचे भारमान घसरले

मुंबई : दुष्काळाच्या झळांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील रहिवाशांनी गेल्या सहा महिन्यांत एसटीने प्रवास करणेच टाळल्याने एसटीचे भारमान घसरले आहे. त्यामुळे महामंडळाला तब्बल १00 कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाकडून दुष्काळग्रस्त भागांत यापुढे जास्तीतजास्त प्रवासी मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पाण्याअभावी त्रस्त झालेल्या अनेकांनी स्थानिक पातळीवरचा आणि लांबचा प्रवास टाळला. याचा फटका एसटी सेवांना बसू लागला. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात तर एसटीची स्थिती फारच बिकट झाली. बसेस आगार आणि स्थानकांत उभ्याच करून ठेवण्यात येत होत्या. एसटीचे भारमान घटत गेले आणि उत्पन्नावरही त्याचा परिणाम होऊ लागला. जानेवारी ते मार्चदरम्यान दुष्काळामुळे एसटीला ३१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. एप्रिल महिन्यात लग्नसराईमुळे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा एसटी महामंडळाला होती. मात्र तसे झाले नाही. एप्रिल ते जूनदरम्यान उत्पन्न तब्बल ८४ कोटी रुपयांनी घटले. एप्रिल ते जून २०१५ या कालावधीशी तुलना केल्यास हे उत्पन्न फारच कमी असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. एकूणच जानेवारी ते जूनदरम्यान एसटीला १00 कोटींपेक्षा जास्त फटका बसला. सहा महिन्यांत एवढा मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाकडून आता नव्या उपाययोजना शोधण्यात येत आहेत. ज्या भागात दुष्काळामुळे फटका बसला त्या भागातून जास्तीतजास्त प्रवासी आणि उत्पन्न कसे मिळविता येईल, यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)>लग्नसराईत ३९ कोटी३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी लग्नसराई जास्त असल्याने त्याचा फायदा घेत एसटीने जादा वाहतूक केली आणि जवळपास ३९ कोटी ४0 लाखांचे उत्पन्न मिळवले. मात्र मे महिना सुरूहोताच भारमान पुन्हा घसरत गेले. त्यामुळे उत्पन्न मिळवूनही त्याचा फारसा फायदा एसटीला झाला नाही. दुष्काळामुळे एसटीचे भारमान घसरले आहे आणि मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. त्यामुळे यापुढे अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. - रणजीतसिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ सुरुवातीच्या तीन महिन्यांत ३१ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाल्याने जूनपर्यंत हा आकडा १00 कोटी पार करेल, असा अंदाज एसटी महामंडळाकडून आधीच वर्तविण्यात येत होता.