शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरला १०० कोटी तर गोंडवानाला केवळ ८ कोटी

By admin | Updated: January 9, 2015 00:45 IST

नवीन सरकारच्या मुख्यमंत्र्यांसह इतर ‘हेवीवेट’ मंत्री नागपूर-चंद्रपूरचे असतानाही विदर्भाला रडगाणे गावे लागत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात गोंडवाना विद्यापिठाचा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित होते.

केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा : १८४ एकर जमिनीची फाईल अडकली मुंबई मंत्रालयातमिलिंद कीर्ती - गडचिरोलीनवीन सरकारच्या मुख्यमंत्र्यांसह इतर ‘हेवीवेट’ मंत्री नागपूर-चंद्रपूरचे असतानाही विदर्भाला रडगाणे गावे लागत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात गोंडवाना विद्यापिठाचा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित होते. पण तसे काही घडले नाही. एका जिल्ह्यापुरते कार्यक्षेत्र असलेल्या सोलापूर विद्यापिठाला आतापर्यंत १०० कोटी रुपये मिळाले तर गडचिरोली येथील ‘गोंडवाना’ला केवळ ७ कोटी ८८ लाख रुपये देण्यात आले आहेत. परिणामी हे विद्यापीठ आहे की, एक महाविद्यालय, अशी केविलवाणी स्थिती निर्माण झाली आहे.२००४ मध्ये सोलापूर विद्यापीठ स्थापन करण्यात आले, तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील केवळ ६० महाविद्यालये संलग्न होती. या विद्यापीठाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका झटक्यात ७०० एकर जागा उपलब्ध करून १०० कोटी रुपयांची तरतूद केली. आता त्या विद्यापीठाशी १२४ महाविद्यालये संलग्न आहेत. तसेच सोलापूर विद्यापीठ स्वतंत्रपणे सुरळीत कार्यरत आहे. तीन वर्षांपूर्वी नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून २ आॅक्टोबर २०११ रोजी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. हे विद्यापीठ सुरू करताना चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २३५ महाविद्यालये संलग्न करण्यात आले. हे विद्यापीठ सुरू झाले तेव्हा नागपूर विद्यापीठाचे उपकेंंद्र असलेली जमीन आणि ७ कोटी ८८ लाख रुपये देण्यात आले. या निधीतून मुले व मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले. राज्य सरकारकडे या विद्यापीठाकरिता मुख्य प्रशासकीय इमारत, पी. जी. डी. टी.ची इमारत, गं्रथालय, परीक्षा विभाग आदी बांधकामाकरिता ६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.यापूर्वीचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी ‘गोंडवाना’च्या प्रस्तावाकडे ढुंकूनही पाहिले नाही. वाट पाहून कंटाळा आल्यावर विद्यापीठाने स्वत:च्या मिळकतीतील एक कोटी रुपयांचे इमारत बांधकाम सुरू केले आहे. नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री नागपूर येथील आणि अर्थ व वनमंत्री चंद्रपूरचे आहेत. तरीही ‘गोंडवाना’चा ६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयात रखडलेला आहे. युजीसीच्या पात्रतेसाठी ‘१२ ब’चा दर्जादिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदान प्राप्त करण्याकरिता ‘१२ब’चा दर्जा मिळविणे आवश्यक आहे. त्याकरिता पाच पद्व्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू करणे, शिक्षक भरती आणि स्वतंत्र इमारती असा निकष आहे. राज्य सरकारने निधी उपलब्ध न केल्याने पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या इमारतीचे बांधकाम हाती घेणे अद्याप शक्य झालेले नाही. विद्यापीठाने आणखी १३ पद्व्युत्तर व सात बी.ए., एम.सी.ए.अभ्यासक्रामचे प्रस्ताव पाठविले आहेत.