शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शिकार केल्यास १० वर्षांची शिक्षा

By admin | Updated: December 15, 2015 04:00 IST

शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस होणारी शिक्षा वाढवून ती १० वर्ष आणि आर्थिक दंड ५ लाख रुपये करण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारला

नागपूर : शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस होणारी शिक्षा वाढवून ती १० वर्ष आणि आर्थिक दंड ५ लाख रुपये करण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारला केली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. वर्षा गायकवाड यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मृत आढळून आलेल्या दोन वाघांचा मुद्दा उपस्थित करीत वन्यप्राण्यांच्या शिकारीवर चिंता व्यक्त केली होती. मुनगंटीवार यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, एका वाघाचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला. राज्यात शिकारींच्या घटना कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. वाघांची संख्या वाढून १९० झाली आहे. सन २०१३ मध्ये ७ वाघांची शिकार झाली. २०१४ मध्ये केवळ एकाच वाघाची शिकार झाली. २०१३ मध्ये ५, २०१४-४, आणि २०१५ मध्ये ६ वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला आहे. राज्यात स्थापन करण्यात आलेल्या टायगर फोर्समुळे शिकारीवर नियंत्रण ठेवता आले आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले की, एका वाघासाठी १० वर्ग किलोमीटरचे वन क्षेत्राची गरज असते. त्यामुळे वन क्षेत्र वाढविण्याचा विचार होत आहे. केंद्राने व्याघ्र प्रकल्पाबाबत महाराष्ट्रात होत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. मेळघाट, पेंच आणि ताडोबाला केंद्राने अतिउत्तम असे म्हटले आहे.जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी सांगितले की, वाघाच्या मृत्यूनंतर वन विभागातर्फे त्याचे पोस्टमार्टम करणे बंधनकारक आहे. त्यामुळे वाघाचे वय आणि मृत्यू कसा झाला याची माहिती मिळते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी वाघांच्या शिकारीत आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, शिकार रोखण्यासाठी ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्यावर भर दिला जात आहे. अधिकाऱ्यांना शस्त्रे आणि वायरलेसने सज्ज करण्यात आले आहे. गुप्त माहिती देणारी यंत्रणाही मजबूत करण्यात येत आहे. याशिवाय ज्या ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)वाघ वाढले की वाघिण शिकारीच्या प्रश्नावर सभागृहातील वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित करून वातावरणाला हलके केले. अमिताभ बच्चन हे टायगर अ‍ॅम्बेसडर बनल्यापासून वाघांची संख्या वाढली की वाघिणींची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी सुद्धा ‘नहले पे दहला’ मारत याची माहिती शोधण्यासाठी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्याचा शासनाचा विचार आहे. दरम्यान भुजबळ यांनी शिवसेनेला लक्ष्य करीत राज्यात सध्या वाघांचे गुरगुरणे वाढले आहे. मुख्यमंत्री त्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी काय उपाययोजना करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.