शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिकार केल्यास १० वर्षांची शिक्षा

By admin | Updated: December 15, 2015 04:00 IST

शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस होणारी शिक्षा वाढवून ती १० वर्ष आणि आर्थिक दंड ५ लाख रुपये करण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारला

नागपूर : शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस होणारी शिक्षा वाढवून ती १० वर्ष आणि आर्थिक दंड ५ लाख रुपये करण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारला केली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. वर्षा गायकवाड यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मृत आढळून आलेल्या दोन वाघांचा मुद्दा उपस्थित करीत वन्यप्राण्यांच्या शिकारीवर चिंता व्यक्त केली होती. मुनगंटीवार यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, एका वाघाचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला. राज्यात शिकारींच्या घटना कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. वाघांची संख्या वाढून १९० झाली आहे. सन २०१३ मध्ये ७ वाघांची शिकार झाली. २०१४ मध्ये केवळ एकाच वाघाची शिकार झाली. २०१३ मध्ये ५, २०१४-४, आणि २०१५ मध्ये ६ वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला आहे. राज्यात स्थापन करण्यात आलेल्या टायगर फोर्समुळे शिकारीवर नियंत्रण ठेवता आले आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले की, एका वाघासाठी १० वर्ग किलोमीटरचे वन क्षेत्राची गरज असते. त्यामुळे वन क्षेत्र वाढविण्याचा विचार होत आहे. केंद्राने व्याघ्र प्रकल्पाबाबत महाराष्ट्रात होत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. मेळघाट, पेंच आणि ताडोबाला केंद्राने अतिउत्तम असे म्हटले आहे.जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी सांगितले की, वाघाच्या मृत्यूनंतर वन विभागातर्फे त्याचे पोस्टमार्टम करणे बंधनकारक आहे. त्यामुळे वाघाचे वय आणि मृत्यू कसा झाला याची माहिती मिळते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी वाघांच्या शिकारीत आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, शिकार रोखण्यासाठी ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्यावर भर दिला जात आहे. अधिकाऱ्यांना शस्त्रे आणि वायरलेसने सज्ज करण्यात आले आहे. गुप्त माहिती देणारी यंत्रणाही मजबूत करण्यात येत आहे. याशिवाय ज्या ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)वाघ वाढले की वाघिण शिकारीच्या प्रश्नावर सभागृहातील वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित करून वातावरणाला हलके केले. अमिताभ बच्चन हे टायगर अ‍ॅम्बेसडर बनल्यापासून वाघांची संख्या वाढली की वाघिणींची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी सुद्धा ‘नहले पे दहला’ मारत याची माहिती शोधण्यासाठी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्याचा शासनाचा विचार आहे. दरम्यान भुजबळ यांनी शिवसेनेला लक्ष्य करीत राज्यात सध्या वाघांचे गुरगुरणे वाढले आहे. मुख्यमंत्री त्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी काय उपाययोजना करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.