शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात दोन महिन्यांत १० वाघांचा मृत्यू

By admin | Updated: May 31, 2016 06:36 IST

निम लष्करी दलाच्या धर्तीवर विदर्भात वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र संरक्षण दल गठित करण्यात आले तरी वाघांच्या नैसर्गिक आणि भूकबळींचे सत्र कायम आहे

गणेश वासनिक,  अमरावतीनिम लष्करी दलाच्या धर्तीवर विदर्भात वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र संरक्षण दल गठित करण्यात आले तरी वाघांच्या नैसर्गिक आणि भूकबळींचे सत्र कायम आहे. गत दोन महिन्यांत दहा वाघ मृत्यमुखी पडले आहेत. मात्र, व्याघ्र संरक्षण दलातील सुरक्षा रक्षकांना यापैकी एकही वाघ दिसू नये, ही बाब त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.केंद्र शासनाने वाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन केले आहे. प्रारंभी पाच वर्षे या संरक्षण दलावर केंद्र शासनाचे नियंत्रण राहणार असून त्यानंतर राज्य शासनावर सर्वस्वी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. राज्यात विदर्भातील वाघांची संख्या अधिक असून त्यांना शिकाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करण्याचे आव्हान या दलापुढे आहे. याशिवाय व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या परिसरात वन्यप्राण्यांचा पायी मागोवा घेणे, वाघांचे सूक्ष्म नियोजन करणे, यशिवाय नैसर्गिक अधिवास समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करुन एकूणच वाघांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या दलावर आहे. परंतु गत दोन महिन्यांत मेळघाटात दोन तर चंद्रपूर, बोर, गोंदिया, भंडारा आदी भागांत ७ ते ८ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दलाच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्रत्येकी तीन, पेंच दोन तर नवेगाव बांध, नागझिरा येथे प्रत्येकी एक दल तयार करण्यात आले आहे. ताडोबात १२० तर मेळघाटात ८१ जवान या दलात कार्यरत आहेत. अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांच्या संरक्षणाबाबत काही धोकादायक बाबी आढळल्यास या दलातील जवानांना थेट फायरिंग करण्याचे विशेषाधिकार आहेत. या दलाच्या जवानांकडे एसएलआर रायफल, वरिष्ठांना रिव्हॉल्वर, वाहने, राहण्याची व्यवस्था, रजेचे नियोजन करण्यात आले आहे. या दलात स्थानिक आदिवासींना प्राधान्य देण्यात आले आहे.