शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

१० हजार जैन करणार सामूहिक उपवास

By admin | Updated: September 12, 2015 02:14 IST

‘मुंबई आमची असून तिच्या विकासात जैनांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पर्युषण पर्वात १८ दिवस मांसविक्री व कत्तलखाना बंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करा.

भार्इंदर : ‘मुंबई आमची असून तिच्या विकासात जैनांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पर्युषण पर्वात १८ दिवस मांसविक्री व कत्तलखाना बंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करा. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जैन गौरव रक्षा समितीच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी भार्इंदर मधील १० हजार जैन सामुहिक उपवास व मंत्रजाप करणार आहेत,’ अशी माहिती आचार्य सागरचंद्र सागर सुरीश्वरजी महाराज यांनी बावन जिनालय जैन मंदिरातील पत्रकार परिषदेत दिली. मीरा भार्इंदर महापालिकेच्या महासभेत भाजपाने कत्तलखाने बंदीचा ठराव केला होता. त्या विरोधात देशभरात पडसाद उमटले असुन शिवसेने पाठोपाठ मनसे, आरपीआय, बविआ, राष्ट्रवादी व काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मीरा भार्इंदरमध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता व महापौर गीता जैन आदींची शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. ‘बाळासाहेब ठाकरे व शिवसेने बद्दल सहानुभुती आहे. उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांनीच थेट जैन समुदायाला टार्गेट केल्याने आम्ही देखील चकीत झालो आहोत. भाजपाशी तुमचा काय वाद असेल ते तुम्ही बघा, पण जैनांना टार्गेट का करता,’ असा सवाल सागरचंद्रजी यांनी केला. पक्षांच्या राजकारणात समाजाला ओढू नका, असे ते म्हणाले.मुंबई आमची !‘मुंबई ही कोणा एका जातीची नाही असे ते म्हणाले. आम्ही पण गणपती, जन्माष्टमी आदी वेळी सहकार्य करतो. या आधी ८ दिवस बंदीचे ठराव झाले. यंदा १८ दिवसांचा झाला. भाजपाचे २९ व अन्य सर्वांचे मिळून ६१ नगरसेवक असतानाही ठराव मंजूर झाला. दर दिवशी प्रत्येकी ३ हजार रुपये नुकसानभरपाई देतो व द्यायला तयार होतो, असे त्यांनी सांगितले.शाकाहारी राहूनही जगता येते. जे आम्हाला समजून घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी उद्या प्रार्थना करणार असल्याचे सागरचंद्रजी यांनी सांगीतले. शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळात बावन जिनालय मंदिरा मागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर उपवास व मंत्रजाप आदी केले जाणार आहे.