शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

१0 विद्यार्थ्यांच्या आहारासाठी मिळतात १४ रुपये

By admin | Updated: July 19, 2016 00:25 IST

पोषण आहार तयार करण्यासाठी १0 विद्यार्थ्यांमागे १४ रुपये ३0 पैसे अनुदान देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती.

गणेश मापारी /खामगाव (जि. बुलडाणा)जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रथिने युक्त आहार देण्याचा गाजावाजा करण्यात येत असला तरी या योजनेतून विद्यार्थ्यांंची थट्टाच चालविण्याचा प्रकार समोर येत आहे. पोषण आहार तयार करण्यासाठी १0 विद्यार्थ्यांमागे १४ रुपये ३0 पैसे अनुदान देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांंची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्या सोबतच विद्यार्थ्यांंनीही जिल्हा परिषदेच्या शाळांना पसंती द्यावी यासाठी वेगवेगळ्या योजना शासनाकडून राबविल्या जात आहेत. पहिली ते आठवी पर्यंंतच्या विद्यार्थ्यांंसाठी उष्मांक व प्रथिनेयुक्त पोषण आहार देण्यात येतो. ग्रामीण भागातील शाळांना तांदुळा सोबतच इतर धान्याचा पुरवठा करण्यात येतो व सदर धान्य शिजविण्यासाठी लागणारे इंधन आणि भाजीपाला खरेदी करण्याकरिता शासनाकडून अनुदान दिल्या जाते. या अनुदानाच्या रकमेत नुकतेचा वाढ करण्यात आली आहे. आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांंचा आहार बनविण्यासाठी प्रति विद्यार्थी १.४३ पैसे इतका खर्च देण्यात येतो. तर शहरी भागासाठी तयार आहार पुरवठा करणार्‍या संस्थांना प्रति विद्यार्थी ३ रुपये ६७ पैसे इतके अनुदान दिल्या जाते. अशाप्रकारे पहिली ते पाचवी पर्यंंतच्या जिल्हा परिषद शाळेच्या १0 विद्यार्थ्यांंसाठी १४ रुपये ३0 पैसे एवढय़ा तोकड्या स्वरुपाचे अनुदान देणे म्हणजे शासनाकडून मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांंची थट्टा चालविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. १४ रुपयांमध्ये एका विद्यार्थ्याचा आहार तयार होणे कठीण असतांनाही एवढय़ा रुपयात १0 विद्यार्थ्यांंचा आहार तयार करण्याच्या या योजनेच्या कल्पनेबाबत सखेद आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे.सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांंसाठी मिळतात १ रुपया ९३ पैसेशालेय पोषण आहार योजनेतून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांंंना ७00 उष्मांक आणि २0 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात यावा, असे निर्देश आहेत. या विद्यार्थ्यांंचा आहार तयार करण्यासाठी इंधन आणि भाजीपाला खरेदी करण्याकरिता प्रति विद्यार्थी १ रुपया ९३ पैसे अनुदान दिल्या जाते.