शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे

By admin | Updated: June 29, 2016 00:45 IST

धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली.

पुणे : धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली. संत तुकाराममहाराज, संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे आगमन होत आहे तसेच रमजान ईदचा सण असल्याने आणखी ८ दिवस वाट पाहून ८ जुलैपासून वाढीव पाणीकपात लागू करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी दिली. याच वेळी शहराला आता पाणी पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री गिरीश बापट यांची असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.महापौर प्रशांत जगताप यांनी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी सकाळी पानशेत व वरसगाव या धरणांतील पाण्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेमध्ये शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. या वेळी सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, गटनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाला नाही; त्यामुळे पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक झाली असल्याने त्यावर मार्ग काढण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये वारी व रमजान ईद झाल्यानंतर १० दिवसांनी पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘हवामान खात्याने ७ दिवसांनंतर चांगला पाऊस होईल, हा सांगितलेला अंदाज चुकीचा ठरला आहे. धरणांनी तळ गाठलेला आहे. शहरात अनेक ठिकाणी गाळमिश्रित पाणी येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सध्या धरणसाठ्यात १.५४ टीएमसी पाणी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या २५ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, तोपर्यंतच्या कालावधीत पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल.’’पाण्याचे कोणतेही नियोजन अद्याप पालकमंत्र्यांकडून करण्यात येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. >मुळशी धरणाच्या पत्रव्यवहाराला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर नाही : स्थिती गंभीरसध्या पाण्याची स्थिती खूपच गंभीर बनली आहे. पाण्याचा आणखी एक पर्याय म्हणून मुळशी धरणातील पाण्याकडे पाहिले जात आहे. शहराला या धरणातून पाणी पुरविण्याबाबत विचार व्हावा, याकरिता महापौरांनी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पत्र पाठविले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना अद्याप त्याचे उत्तर देण्यासाठी वेळ मिळालेला नाही.विहिरींची स्वच्छता करण्याच्या सूचनापाऊस न झाल्यास आपत्कालीन उपाययोजना म्हणून शहरातील सर्व विहिरींमधील गाळ काढण्यात यावा. त्याचबरोबर, बोअरवेलची माहिती घेण्यात यावी. कोणत्या भागांना तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, याची यादी करावी आदी सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.