शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे

By admin | Updated: June 29, 2016 00:45 IST

धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली.

पुणे : धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली. संत तुकाराममहाराज, संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे आगमन होत आहे तसेच रमजान ईदचा सण असल्याने आणखी ८ दिवस वाट पाहून ८ जुलैपासून वाढीव पाणीकपात लागू करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी दिली. याच वेळी शहराला आता पाणी पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री गिरीश बापट यांची असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.महापौर प्रशांत जगताप यांनी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी सकाळी पानशेत व वरसगाव या धरणांतील पाण्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेमध्ये शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. या वेळी सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, गटनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाला नाही; त्यामुळे पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक झाली असल्याने त्यावर मार्ग काढण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये वारी व रमजान ईद झाल्यानंतर १० दिवसांनी पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘हवामान खात्याने ७ दिवसांनंतर चांगला पाऊस होईल, हा सांगितलेला अंदाज चुकीचा ठरला आहे. धरणांनी तळ गाठलेला आहे. शहरात अनेक ठिकाणी गाळमिश्रित पाणी येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सध्या धरणसाठ्यात १.५४ टीएमसी पाणी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या २५ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, तोपर्यंतच्या कालावधीत पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल.’’पाण्याचे कोणतेही नियोजन अद्याप पालकमंत्र्यांकडून करण्यात येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. >मुळशी धरणाच्या पत्रव्यवहाराला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर नाही : स्थिती गंभीरसध्या पाण्याची स्थिती खूपच गंभीर बनली आहे. पाण्याचा आणखी एक पर्याय म्हणून मुळशी धरणातील पाण्याकडे पाहिले जात आहे. शहराला या धरणातून पाणी पुरविण्याबाबत विचार व्हावा, याकरिता महापौरांनी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पत्र पाठविले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना अद्याप त्याचे उत्तर देण्यासाठी वेळ मिळालेला नाही.विहिरींची स्वच्छता करण्याच्या सूचनापाऊस न झाल्यास आपत्कालीन उपाययोजना म्हणून शहरातील सर्व विहिरींमधील गाळ काढण्यात यावा. त्याचबरोबर, बोअरवेलची माहिती घेण्यात यावी. कोणत्या भागांना तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, याची यादी करावी आदी सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.