शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे

By admin | Updated: June 29, 2016 00:45 IST

धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली.

पुणे : धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली. संत तुकाराममहाराज, संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे आगमन होत आहे तसेच रमजान ईदचा सण असल्याने आणखी ८ दिवस वाट पाहून ८ जुलैपासून वाढीव पाणीकपात लागू करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी दिली. याच वेळी शहराला आता पाणी पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री गिरीश बापट यांची असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.महापौर प्रशांत जगताप यांनी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी सकाळी पानशेत व वरसगाव या धरणांतील पाण्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेमध्ये शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. या वेळी सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, गटनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाला नाही; त्यामुळे पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक झाली असल्याने त्यावर मार्ग काढण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये वारी व रमजान ईद झाल्यानंतर १० दिवसांनी पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘हवामान खात्याने ७ दिवसांनंतर चांगला पाऊस होईल, हा सांगितलेला अंदाज चुकीचा ठरला आहे. धरणांनी तळ गाठलेला आहे. शहरात अनेक ठिकाणी गाळमिश्रित पाणी येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सध्या धरणसाठ्यात १.५४ टीएमसी पाणी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या २५ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, तोपर्यंतच्या कालावधीत पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल.’’पाण्याचे कोणतेही नियोजन अद्याप पालकमंत्र्यांकडून करण्यात येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. >मुळशी धरणाच्या पत्रव्यवहाराला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर नाही : स्थिती गंभीरसध्या पाण्याची स्थिती खूपच गंभीर बनली आहे. पाण्याचा आणखी एक पर्याय म्हणून मुळशी धरणातील पाण्याकडे पाहिले जात आहे. शहराला या धरणातून पाणी पुरविण्याबाबत विचार व्हावा, याकरिता महापौरांनी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पत्र पाठविले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना अद्याप त्याचे उत्तर देण्यासाठी वेळ मिळालेला नाही.विहिरींची स्वच्छता करण्याच्या सूचनापाऊस न झाल्यास आपत्कालीन उपाययोजना म्हणून शहरातील सर्व विहिरींमधील गाळ काढण्यात यावा. त्याचबरोबर, बोअरवेलची माहिती घेण्यात यावी. कोणत्या भागांना तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, याची यादी करावी आदी सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.