शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा

By admin | Updated: May 17, 2016 20:44 IST

15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतयेवला, दि. १७ : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पाणीसाठा 15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18  मे पासून येवला शहराला 10  दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येवला नगरपालिकेच्या साठवण तलावात सध्या केवळ 17 द.ल.घ.फुट पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी आगामी  1 जुलै पर्यंत पुरवण्याचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.पाणी जून अखेर पुरवण्याचे आव्हान पेलवले जाणार नसल्याची चिन्हे आहेत.पाऊस जर आला नाही तर जुनच्या पहिल्या आठवड्यात  पाण्यासाठी शहरवासीयांची वनवन होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळेच 10 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.यंदाच्या पालखेड आवर्तनां प्रमाणे पुढील आवर्तन येण्यास देखील विलंब झाला होता.सध्या  येवला शहरातील साठवण तलावात उपलब्ध 17  द ल घ फुट पाण्याच्या  साठ्यातून येवला शहराला 10  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, ,मुख्याधिकारी  राहुल वाघ,पाणीपुरवठा सभापती रिजवान शेख,अभियंता जे.बी.फुलारी  यांनी केले आहे. तसेच नळांना तोट्या बसवाव्या, नादुरुस्त नळ तातडीने दुरस्त करून घ्यावे.शहराला पिण्यासाठी रोज 50 लाख लिटर पाणी लागते. सध्याचे 17 द.ल. घ.फुट पाणी 10 दिवसाच्या अंतराने शहरवासियांना दिले तर 15 जून पर्यंत पाणी पुरणार आहे. येवला तालुका भयानक दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना शहरातील साठवण तलावात आलेल्या 17 दलघफू पाणी शिल्लक आहे.पाण्याचे काटेकोर नियोजन केले नाही तर अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर उपसा यामुळे जून च्या पहिल्या आठवड्यात नागरिकाना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये हि अपेक्षा आहे. साठवण तलावालगत असलेल्या काही विहिरी ताब्यात घेतल्या आहेत.पाणीटंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जाण्यापूर्वीच आता पालिकेने पाण्याबाबत काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.पालिकेने अनधिकृत पाणी उपश्या बाबत पथके तयार केली असली तरी अवैध मार्गाने पाणी उपसा चालू असल्याची चर्चा शहरात आहे.रात्रीच्या वेळी साठवण तलाव परिसरात पाण्याची विक्री होणार नाही याची देखील पालिकेला काळजी घ्यावी लागेल.अनधिकृत सर्रास पाणी उपसा आजही होतो असे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सुमारे 125 ते 150 टँकर पाणी शहरातील साठवण तलाव लगतच्या पाणी स्रोतातून भरले जात आहे.