शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा

By admin | Updated: May 17, 2016 20:44 IST

15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतयेवला, दि. १७ : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पाणीसाठा 15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18  मे पासून येवला शहराला 10  दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येवला नगरपालिकेच्या साठवण तलावात सध्या केवळ 17 द.ल.घ.फुट पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी आगामी  1 जुलै पर्यंत पुरवण्याचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.पाणी जून अखेर पुरवण्याचे आव्हान पेलवले जाणार नसल्याची चिन्हे आहेत.पाऊस जर आला नाही तर जुनच्या पहिल्या आठवड्यात  पाण्यासाठी शहरवासीयांची वनवन होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळेच 10 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.यंदाच्या पालखेड आवर्तनां प्रमाणे पुढील आवर्तन येण्यास देखील विलंब झाला होता.सध्या  येवला शहरातील साठवण तलावात उपलब्ध 17  द ल घ फुट पाण्याच्या  साठ्यातून येवला शहराला 10  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, ,मुख्याधिकारी  राहुल वाघ,पाणीपुरवठा सभापती रिजवान शेख,अभियंता जे.बी.फुलारी  यांनी केले आहे. तसेच नळांना तोट्या बसवाव्या, नादुरुस्त नळ तातडीने दुरस्त करून घ्यावे.शहराला पिण्यासाठी रोज 50 लाख लिटर पाणी लागते. सध्याचे 17 द.ल. घ.फुट पाणी 10 दिवसाच्या अंतराने शहरवासियांना दिले तर 15 जून पर्यंत पाणी पुरणार आहे. येवला तालुका भयानक दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना शहरातील साठवण तलावात आलेल्या 17 दलघफू पाणी शिल्लक आहे.पाण्याचे काटेकोर नियोजन केले नाही तर अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर उपसा यामुळे जून च्या पहिल्या आठवड्यात नागरिकाना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये हि अपेक्षा आहे. साठवण तलावालगत असलेल्या काही विहिरी ताब्यात घेतल्या आहेत.पाणीटंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जाण्यापूर्वीच आता पालिकेने पाण्याबाबत काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.पालिकेने अनधिकृत पाणी उपश्या बाबत पथके तयार केली असली तरी अवैध मार्गाने पाणी उपसा चालू असल्याची चर्चा शहरात आहे.रात्रीच्या वेळी साठवण तलाव परिसरात पाण्याची विक्री होणार नाही याची देखील पालिकेला काळजी घ्यावी लागेल.अनधिकृत सर्रास पाणी उपसा आजही होतो असे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सुमारे 125 ते 150 टँकर पाणी शहरातील साठवण तलाव लगतच्या पाणी स्रोतातून भरले जात आहे.