शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा

By admin | Updated: May 17, 2016 20:44 IST

15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतयेवला, दि. १७ : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पाणीसाठा 15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18  मे पासून येवला शहराला 10  दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येवला नगरपालिकेच्या साठवण तलावात सध्या केवळ 17 द.ल.घ.फुट पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी आगामी  1 जुलै पर्यंत पुरवण्याचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.पाणी जून अखेर पुरवण्याचे आव्हान पेलवले जाणार नसल्याची चिन्हे आहेत.पाऊस जर आला नाही तर जुनच्या पहिल्या आठवड्यात  पाण्यासाठी शहरवासीयांची वनवन होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळेच 10 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.यंदाच्या पालखेड आवर्तनां प्रमाणे पुढील आवर्तन येण्यास देखील विलंब झाला होता.सध्या  येवला शहरातील साठवण तलावात उपलब्ध 17  द ल घ फुट पाण्याच्या  साठ्यातून येवला शहराला 10  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, ,मुख्याधिकारी  राहुल वाघ,पाणीपुरवठा सभापती रिजवान शेख,अभियंता जे.बी.फुलारी  यांनी केले आहे. तसेच नळांना तोट्या बसवाव्या, नादुरुस्त नळ तातडीने दुरस्त करून घ्यावे.शहराला पिण्यासाठी रोज 50 लाख लिटर पाणी लागते. सध्याचे 17 द.ल. घ.फुट पाणी 10 दिवसाच्या अंतराने शहरवासियांना दिले तर 15 जून पर्यंत पाणी पुरणार आहे. येवला तालुका भयानक दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना शहरातील साठवण तलावात आलेल्या 17 दलघफू पाणी शिल्लक आहे.पाण्याचे काटेकोर नियोजन केले नाही तर अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर उपसा यामुळे जून च्या पहिल्या आठवड्यात नागरिकाना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये हि अपेक्षा आहे. साठवण तलावालगत असलेल्या काही विहिरी ताब्यात घेतल्या आहेत.पाणीटंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जाण्यापूर्वीच आता पालिकेने पाण्याबाबत काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.पालिकेने अनधिकृत पाणी उपश्या बाबत पथके तयार केली असली तरी अवैध मार्गाने पाणी उपसा चालू असल्याची चर्चा शहरात आहे.रात्रीच्या वेळी साठवण तलाव परिसरात पाण्याची विक्री होणार नाही याची देखील पालिकेला काळजी घ्यावी लागेल.अनधिकृत सर्रास पाणी उपसा आजही होतो असे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सुमारे 125 ते 150 टँकर पाणी शहरातील साठवण तलाव लगतच्या पाणी स्रोतातून भरले जात आहे.