शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

दहा कोटींचा बहरला सट्टा

By admin | Updated: September 26, 2014 00:24 IST

नेहमीपेक्षा पाच कोटींची वाढ : उमेदवार निश्चितीच्या अंदाजाने गाठला कहर

संतोष पाटील - कोल्हापूर -पितृपक्ष पंधरवडा संपताच युती-आघाडी यांच्यात जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या मुंबई-दिल्लीत झाल्या. जिल्ह्यातील कोण उमेदवार कोणत्या पक्षाचा झेंडा घेणार, आघाडी-युती होणार की नाही, कोण कोणाच्या विरोधात असणार, आदी मुद्द्यांवर जिल्ह्यातील सट्टाबाजारात दररोज किमान १० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होत आहे. निकालापूर्वीच कोणाच्या खांद्यावर कोणाचा झेंडा असणार याचा कट्ट्यापासून कार्पोरेट जगतापर्यंत चर्चेला ऊत आला असताना सट्ट्यामुळे बुकीचालक मात्र मालामाल होत आहेत. क्रिकेट सामन्यासह मंगळावर यान उतरणार की नाही, या मुद्द्यावर दररोज मोबाईलद्वारे खेळल्या जाणाऱ्या सट्ट्याची व मटक्याची कोल्हापुरात पाच कोटींपेक्षा अधिकची उलाढाल आहे. यामध्ये आता दुप्पटीने वाढ झाली आहे. क्रिकेट व इतर खेळांसाठी सट्टा चालविणारी यंत्रणाच आता निवडणुकीच्या काळातही सट्ट्यातून हात धुऊन घेत आहे. यापूर्वी निवडणुकीत मतदानापूर्वी सट्टा बाजार बहरत असे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिंकणार कोण, यापेक्षा आघाडी व युती होणार की नाही. कोण कोणत्या पक्षात असेल, यावरच अधिक सट्टा लावला गेला. पितृपक्ष पंधरवडा होईपर्यंत आघाडी व युती होणार काय व कोण किती जागांवर लढणार, कोल्हापुरात काय स्थिती असेल, यावर सट्टा लावला गेला. आता युती व आघाडी तुटल्यास कोण कोणत्या पक्षात असेल, यावर जोरात सट्टेबाजी सुरू आहे. असा लावला जातो सट्टा... क्रिकेटसाठी खेळल्या जाणाऱ्या सट्ट्यातील यंत्रणाच निवडणुकीतील सट्टेबाजारात सक्रिय आहे. नियमित सट्टा खेळणारा व बुकी यांच्यात एक खास मोबाईल क्रमांक असतो. अचानक उठून कोणासही सट्टेबाजारात प्रवेश मिळत नाही. अवघ्या दहा ते पंधरा सेकंदांच्या संवादात सांकेतिक भाषेत सट्टा लावला जातो. क्रिकेट सामना, मालिका किंवा मोठी मालिका यावेळी संपूर्ण खेळ संपल्यानंतर दररोजची बेरीज-वजाबाकी करून कोणी, कोणाला, किती पैसे द्यायचे, याचा हिशेब केला जातो. याच धर्तीवर निवडणूक काळात खेळला जाणारा सट्ट्याचा हिशेब निकाल लागल्यानंतर पूर्ण केला जातो. आता उमेदवारीवरून सुरू असलेला सट्टा कोण जिंकणार, कोणाची सत्ता येणार, इथपासून कोण मुख्यमंत्री होणार, यावरही खेळला जाणार आहे. क्रिकेटच्या सामन्यासाठी ज्याप्रमाणे प्रत्येक ओव्हर व चेंडूवर सट्टा लावला जातो, त्याप्रमाणेच मतमोजणीदिवशी प्रत्येक फेरीला सट्टा खेळला जातो. सट्टेबाजारातील सर्वच यंत्रणा अंडरग्राउंड असल्याने पोलीस यंत्रणा काहीही करू शकत नाही.निवडणूक काळात पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण असल्याने सट्टेबाजार अधिकच बहरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.