शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

काँग्रेसचे १० आमदार सेनेच्या टप्प्यात?

By admin | Updated: June 12, 2014 04:33 IST

लोकसभा निवडणुकीनंतर जोमात आलेल्या भाजपा-शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही विद्यमान आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

अतुल कुलकर्णी , मुंबईलोकसभा निवडणुकीनंतर जोमात आलेल्या भाजपा-शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही विद्यमान आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेने राज्यातील दहा असे आमदार हेरून ठेवले असून त्यांना आमदारकीच्या तिकीटासोबतच निवडून आणण्यासाठीची रसद देखील पुरवली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे पानीपत झाले. त्यामुळे विदर्भातील या दोन पक्षाचे आमदार आत्ताच हवालदिल झाले आहेत. नांदेड-हिंगोली सोडले तर तीच अवस्था मराठवाड्याची आहे. सेनेने काँग्रेसच्या ज्या आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे त्या जागा भाजपाच्या वाट्याच्या आहेत. शिवसेनेने काँग्रेसच्या मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. तर भाजपाने राष्ट्रवादीचे आमदार हेरणे सुरू केले आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील नाराज आमदारांची पहिली पसंती भाजपा आहे. मात्र मतदारसंघांमधील स्थानिक गणिते लक्षात घेऊन काही नाराज काँग्रेस आमदारांनी शिवसेनेकडे कल दाखवला आहे. या दहा आमदारांचे नेतृत्व कोण करीत आहे, याविषयी कमालीची गुप्तता पाळली जात आहे. वाट्याला आलेल्या पण भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस निवडून आलेल्या जागा शिवसेनेच्या टप्प्यात आहेत. उद्या शिवसेनेला दूर करण्याची भूमिका भाजपाने घेतलीच तर भाजपाच्या विरोधात हे हत्यार वापरायचे, असाही यामागे दूरगामी विचार आहे. भाजपा आज जरी राज्यातल्या अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर दिसत असली तरी भाजपाने आत्तापर्यंत तीन सर्व्हे करुन घेतले आहेत. त्यात अ, ब, क असे तीन गट पाडले आहेत. सर्व्हेमध्ये ज्यांना ‘अ’ गट मिळालेला आहे त्या जागी भाजपा स्वत:ची महत्वाची माणसे उभे करेल. ‘ब’मध्ये दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे तर जे मतदारसंघ ‘क’ दर्जात आहेत त्या जागा महायुतीत मित्र पक्षांना सोडण्याची तयारी भाजपाने केली आहे. रामदास आठवले आणि विनायक मेटे यांची जबाबदारी शिवसेनेने घ्यायची तर महादेव जानकर, राजू शेट्टी यांची जबाबदारी भाजपाने घ्यायची अशी विभागणी गोपीनाथ मुंडे असताना झालेली होती.आठवले यांना शिवसेनेने महायुतीत आणले मात्र भाजपाने खासदारकी दिली. आता त्यांचे मंत्रीपद शिवसेनेच्या कोट्यातून दिले जावे असा भाजपाचा आग्रह आहे.