शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १० शहरे ‘स्मार्ट’ होणार

By admin | Updated: August 28, 2015 04:56 IST

येत्या पाच वर्षांत देशातील किमान १०० शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड झालेल्या ९८ शहरांची नावे केंद्रीय

नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत देशातील किमान १०० शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड झालेल्या ९८ शहरांची नावे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश करताना केंद्राने राज्याने शिफारस केलेल्या यादीतून पिंपरी-चिंचवड वगळले आहे. पणजी हे गोव्याच्या राजधानीचे शहरही स्मार्ट शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील जम्मू की श्रीनगर आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली की मेरठ याचा निर्णय न झाल्याने राहिलेल्या दोन प्रस्तावित ‘स्मार्ट सिटी’ज्ची नावे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.अशी झाली महाराष्ट्रातील शहरांची निवडमिशनच्या रचनेनुसार प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करायच्या शहरांचा आकडा ठरविला होता. त्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला १० शहरे आली होती. राज्य सरकारांनी आपल्याकडील कोणती शहरे अशा प्रकारे विकसित केली जावीत हे पूर्वनिर्धारित निकषांनुसार ठरवून तसे प्रस्ताव ३१ जुलैपर्यंत केंद्राकडे पाठवायचे होते.राज्य सरकारने पुणे व पिंपरी-चिंचवड यांची एकत्र मोट बांधून १० शहरांची नावे पाठविली होती. केंद्र सरकारने त्यातून पिंपरी-चिंचवड वगळून १० शहरांची निवड केली आहे.ही आहेत शहरे..शहर लोकसंख्या (आकडेवारी लाखांत)बृहन्मुंबई १२४ पुणे३१.२४ ठाणे १८.४१ कल्याण-डोंबिवली १५.१८नाशिक १४.८६औरंगाबाद ११.६५नवी मुंबई ११.१९नागपूर ९.५२ सोलापूर ७.४५ अमरावती ७.४२ आयटी संपर्कता व डिजिटायझेशन, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, ई-गव्हर्नन्स यांच्यासह पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, वाहतूक, घन कचरा व्यवस्थापन व परवडणारी घरे या सर्वाच्या माध्यमातून दर्जेदार नागरी जीवनमान उपलब्ध करून देण्याची योजना आहे. - एम. व्यंकय्या नायडू, नगरविकासमंत्री