शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

राज्यात १० शहरे ‘स्मार्ट’ होणार

By admin | Updated: August 28, 2015 04:56 IST

येत्या पाच वर्षांत देशातील किमान १०० शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड झालेल्या ९८ शहरांची नावे केंद्रीय

नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत देशातील किमान १०० शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड झालेल्या ९८ शहरांची नावे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश करताना केंद्राने राज्याने शिफारस केलेल्या यादीतून पिंपरी-चिंचवड वगळले आहे. पणजी हे गोव्याच्या राजधानीचे शहरही स्मार्ट शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील जम्मू की श्रीनगर आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली की मेरठ याचा निर्णय न झाल्याने राहिलेल्या दोन प्रस्तावित ‘स्मार्ट सिटी’ज्ची नावे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.अशी झाली महाराष्ट्रातील शहरांची निवडमिशनच्या रचनेनुसार प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करायच्या शहरांचा आकडा ठरविला होता. त्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला १० शहरे आली होती. राज्य सरकारांनी आपल्याकडील कोणती शहरे अशा प्रकारे विकसित केली जावीत हे पूर्वनिर्धारित निकषांनुसार ठरवून तसे प्रस्ताव ३१ जुलैपर्यंत केंद्राकडे पाठवायचे होते.राज्य सरकारने पुणे व पिंपरी-चिंचवड यांची एकत्र मोट बांधून १० शहरांची नावे पाठविली होती. केंद्र सरकारने त्यातून पिंपरी-चिंचवड वगळून १० शहरांची निवड केली आहे.ही आहेत शहरे..शहर लोकसंख्या (आकडेवारी लाखांत)बृहन्मुंबई १२४ पुणे३१.२४ ठाणे १८.४१ कल्याण-डोंबिवली १५.१८नाशिक १४.८६औरंगाबाद ११.६५नवी मुंबई ११.१९नागपूर ९.५२ सोलापूर ७.४५ अमरावती ७.४२ आयटी संपर्कता व डिजिटायझेशन, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, ई-गव्हर्नन्स यांच्यासह पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, वाहतूक, घन कचरा व्यवस्थापन व परवडणारी घरे या सर्वाच्या माध्यमातून दर्जेदार नागरी जीवनमान उपलब्ध करून देण्याची योजना आहे. - एम. व्यंकय्या नायडू, नगरविकासमंत्री