शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पावसामुळे १ हजार कोटींचा फटका

By admin | Updated: March 3, 2015 02:55 IST

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मुंबई : राज्याच्या वेगवेगळ््या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. केवळ यवतमाळ जिल्ह्यात १७ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले असले तरी रब्बी पिकाची अंतिम आणेवारी १५ मार्च २०१५ रोजी येत असल्याने तोपर्यंत थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणार नाही.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, अवकाळी  पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, द्राक्ष आणि डाळींब यांचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झाला असून १७ हजार हेक्टर जमिनीवरील पिकाची हानी झाली. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले. सांगली परिसरात बेदाण्यांची हानी झाली आहे. कोकणात आंब्याचे नुकसान झाले आहे. आणेवारीपर्यंत थांबायचे की..?गारपिटीच्या संकटाच्यावेळी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. ती मदत अद्याप प्राप्त झालेली नाही, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता येत्या आठ ते दहा दिवसांत गारपीटग्रस्तांना केंद्र सरकारने देऊ केलेली मदत प्राप्त होईल, असे सांगितले. गारपीट झाली तेव्हा डिसेंबरमध्ये अंतिम आणेवारी येईपर्यंत थांबावे लागले होते. रब्बी पिकाचे अवकाळी पावसाने नुकसान झाले असून या पिकांची अंतिम आणेवारी १५ मार्च २०१५ रोजी येईल. त्यामुळे त्याकरिता थांबून मग नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला तर प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम हाती पडण्यास उशिर होईल, अशी चिंता याबाबतच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.