शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे १ हजार कोटींचा फटका

By admin | Updated: March 3, 2015 02:55 IST

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मुंबई : राज्याच्या वेगवेगळ््या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. केवळ यवतमाळ जिल्ह्यात १७ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले असले तरी रब्बी पिकाची अंतिम आणेवारी १५ मार्च २०१५ रोजी येत असल्याने तोपर्यंत थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणार नाही.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, अवकाळी  पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, द्राक्ष आणि डाळींब यांचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झाला असून १७ हजार हेक्टर जमिनीवरील पिकाची हानी झाली. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले. सांगली परिसरात बेदाण्यांची हानी झाली आहे. कोकणात आंब्याचे नुकसान झाले आहे. आणेवारीपर्यंत थांबायचे की..?गारपिटीच्या संकटाच्यावेळी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. ती मदत अद्याप प्राप्त झालेली नाही, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता येत्या आठ ते दहा दिवसांत गारपीटग्रस्तांना केंद्र सरकारने देऊ केलेली मदत प्राप्त होईल, असे सांगितले. गारपीट झाली तेव्हा डिसेंबरमध्ये अंतिम आणेवारी येईपर्यंत थांबावे लागले होते. रब्बी पिकाचे अवकाळी पावसाने नुकसान झाले असून या पिकांची अंतिम आणेवारी १५ मार्च २०१५ रोजी येईल. त्यामुळे त्याकरिता थांबून मग नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला तर प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम हाती पडण्यास उशिर होईल, अशी चिंता याबाबतच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.