शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

पावसामुळे १ हजार कोटींचा फटका

By admin | Updated: March 3, 2015 02:55 IST

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मुंबई : राज्याच्या वेगवेगळ््या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. केवळ यवतमाळ जिल्ह्यात १७ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले असले तरी रब्बी पिकाची अंतिम आणेवारी १५ मार्च २०१५ रोजी येत असल्याने तोपर्यंत थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणार नाही.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, अवकाळी  पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, द्राक्ष आणि डाळींब यांचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झाला असून १७ हजार हेक्टर जमिनीवरील पिकाची हानी झाली. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले. सांगली परिसरात बेदाण्यांची हानी झाली आहे. कोकणात आंब्याचे नुकसान झाले आहे. आणेवारीपर्यंत थांबायचे की..?गारपिटीच्या संकटाच्यावेळी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. ती मदत अद्याप प्राप्त झालेली नाही, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता येत्या आठ ते दहा दिवसांत गारपीटग्रस्तांना केंद्र सरकारने देऊ केलेली मदत प्राप्त होईल, असे सांगितले. गारपीट झाली तेव्हा डिसेंबरमध्ये अंतिम आणेवारी येईपर्यंत थांबावे लागले होते. रब्बी पिकाचे अवकाळी पावसाने नुकसान झाले असून या पिकांची अंतिम आणेवारी १५ मार्च २०१५ रोजी येईल. त्यामुळे त्याकरिता थांबून मग नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला तर प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम हाती पडण्यास उशिर होईल, अशी चिंता याबाबतच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.