शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तीन तासांत १९१ अर्ज

By admin | Updated: June 8, 2016 02:02 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मंगळवारपासून विद्यार्थ्यांनी वाशी येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गर्दी केली असून अवघ्या तीन तासांत छायाप्रतींसाठी १९१ अर्ज दाखल झाल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत असमाधान असल्याने छायांकित प्रत तसेच गुणपडताळणी विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येतो.दहावी- बारावीच्या निकालानंतर वाशीतील बोर्डात अर्जांचा पाऊस सुरु झाला आहे. छायाप्रतींचे शुल्क प्रत्येक विषयाला ४०० रुपये इतके, गुणपडताळणीसाठी ५० रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. दहावीसाठी छायांकित प्रतीसाठी २७ जून ही शेवटची तारीख असून गुणपडताळणीसाठी १६ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये आकारण्यात येणारे शुल्क रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने संबंधित विभागीय मंडळामध्ये जमा करण्याच्या सूचनाही बोर्डाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही अर्ज भरण्यासाठी वाशीतील शिक्षण मंडळाकडे धाव घेतली आहे. गुण पडताळणीकरिता अर्जासोबत गुणपत्रिकेची प्रत (संकेतस्थळावरील प्रिंटआऊट) जोडणे आवश्यक आहे. अकरावी प्रवेशाकरिता मुंबई विभागातील मान्यताप्राप्त शाळांची संख्या ११५६ इतकी असून यामध्ये ठाणे, रायगड, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई १ आणि मुंबई २ यांचा समावेश आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.हल्लीचे विद्यार्थी मिळालेल्या गुणांनी समाधानी नाहीत. आपली स्वत:ची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढत असून छायाप्रतीच्या पर्यायामुळे विद्यार्थ्यांना स्वत:चा आरसा पाहण्याची संधी मिळते. यंदा गुणपडताळणी तसेच छायाप्रतीसाठीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. - डॉ. सुभाष बोरसे, सहसचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळबारावीच्या १६१९ विद्यार्थ्यांचे अर्जबारावीच्या निकालानंतर गुणपडताळणीकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून असून १६१९ विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. यामध्ये कला शाखेतील १२३ विद्यार्थी, वाणिज्य शाखेतील ५०९ आणि विज्ञान शाखेतील ९७७ अर्ज आले आहेत. छायांकित प्रतीसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना १४ जूनपर्यंत अर्ज करता येणार असून सोमवारपर्यंत आलेल्या अर्जांची संख्या ५ हजार ९६८ इतकी आहे. यामध्ये कला शाखेतील २३१, वाणिज्य शाखेतील १६६० आणि विज्ञान शाखेतील ४०९५ अर्ज आल्याची माहिती बोर्डाने दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट अर्ज येण्याची शक्यता बोर्डाकडून वर्तवण्यात येत असून १४ जूनपर्यंत अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.