शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
4
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
6
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
7
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
8
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
9
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
10
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
11
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
12
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
13
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
14
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
15
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
16
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
17
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
18
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
19
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
20
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

जिल्हा परिषदेकडून आता सरपंच स्वच्छता सवांद मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST

उस्मानाबाद : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची असते. हीच बाब हेरून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता ...

उस्मानाबाद : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची असते. हीच बाब हेरून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी ''सरपंच स्वछता सवांद'' हा उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५३ आणि दुसऱ्या टप्प्यात दोनशेवर गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील कामे सुरु झाली आहेत. मात्र, ही कामे केवळ गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक यांच्या माध्यमातून मुदतीत पूर्ण होणार नाहीत. यासाठी गावच्या सरपंचांचीही तितकीच खंबीर साथ लाभणे गरजेचे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी ''सरपंच स्वच्छता सवांद'' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून ते ऑनलाईन सवांद साधत आहेत. याचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहेत. थेट सीईओ आपल्याशी सवांद साधत आहेत, म्हटल्यावर सरपंच मंडळी आता पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने कार्यरत झाली आहेत. त्यामुळे मंजूर कामाची गतीही वाढली आहे.

कोट...

कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घरातील वैयक्तिक शौचालय सुविधेचा नियमित वापर केला पाहीजे. जे नागरिक उघड्यावर शौचास जातात, त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी गावात गुडमाॅर्निंग पथके कार्यान्वित करावीत.

जिल्ह्यात २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे होणेसाठी कुटुंबस्तर व सार्वजनिक स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन करण्याकरिता शोषखड्ड्यांची निर्मिती केली जात असून, शोषखड्ड्यांची निर्मिती करताना गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून शोषखड्डे दूर अंतरावर असावेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होणार नाहीत, याची सरपंच व ग्रामसेवकांनी दक्षता घ्यावी.

-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद.

यात जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे.

कोट...

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ''स्वच्छता ही सेवा'' अभियानात गावात सार्वजनिक ठिकाणच्या परिसराची स्वच्छता, प्लास्टिक कचरा संकलन, सिंगल युझ प्लास्टिक वापर बंदी ठराव घ्यावेत.

-अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.