शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

लाईक्स, कमेंट्स, स्टेटसमध्ये अडकली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST

अहमदपूर : सोशल मीडियामुळे जग जवळ आले असून दूरवरील व्यक्तीसोबतचा संपर्क वाढला आहे. पण, जवळचा दुरावत आहे. कमेंटस्, स्टेटस, ...

अहमदपूर : सोशल मीडियामुळे जग जवळ आले असून दूरवरील व्यक्तीसोबतचा संपर्क वाढला आहे. पण, जवळचा दुरावत आहे. कमेंटस्, स्टेटस, लाईक्सला महत्त्व दिले जात असल्याने तरुणाई त्यात अडकत आहे. परिणामी, मानसिक आरोग्यावर परिणाम हाेत असल्याने पालकांतून चिंता व्यक्त होत आहे.

मोबाईलमुळे अख्खे विश्व जवळ आले आहे. सेल्फी, स्टंट, व्हिडिओ कॉलिंगसाठी तरुण मुले धोक्याच्या स्थळी जात आहेत. त्याचे व्हिडिओ चित्रण करून ते सोशल मीडियावर अपलोड केल्यास जास्त लाईक मिळतात, अशी भावना निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरील आभासी जीवनाकडे कल वाढला आहे. त्यातूनच काही मुलांमध्ये नकारात्मक, जिद्दीची भावना वाढून सहनशीलता कमी होत आहे.

सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे कमेंट, लाईक्सला महत्त्व दिले जात आहे. इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, कौतुक, स्तुती करावी. इतरांपेक्षा वेगळे असावे, काहीतरी वेगळे करावे, अशी धडपड तरुणाई करीत आहे. त्यातून कमी लाईक्स, कमेंट मिळाल्या तर निराशा वाढते आणि जास्त लाईक मिळाल्या की, त्याच विश्वात तरुण गुरफटून जात असल्याचे चित्र आहे. यातून स्वमग्न होणे, एकलकोंडेपणा, निराशा असे परिणाम वाढत आहेत.

दररोज दीड जीबी, अख्खीखी तरूणाई बिझी...

सध्या सर्वत्र मोबाईल इंटरनेटचे आकर्षण मुलांमध्ये वाढत आहे. त्यामुळे मुले मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. बहुतांश घरातील संवाद कमी होत आहे. दररोज दीड जीबी, सारा तालुका बिझी अशी अवस्था झाली आहे. माझा मुलगा छान मोबाईल हाताळतो, त्याला मोबाईल मधलं सगळं काही जमतं अशी कौतुकाची थाप पालकवर्ग मारत आहे. मात्र, मुलं जशी त्यात गुरफटत गेली, तेव्हा पालकांना भीती वाटायला लागली. मुलं आता हाताबाहेर जाऊ लागल्याने पालकांना काय करावे ? असा प्रश्न पडला आहे.

मोबाईलचा अतिवापर...

मोबाईलचे मुलांना व्यसन लागत आहे. त्यामुळे मनाची एकाग्रता कमी होते. सतत मोबाईल वापरामुळे डोक्यावर ताण येऊन डोळ्यावर परिणाम होतो. व्यक्तिमत्त्वात हट्टी व जिद्दीपणा वाढतो. वनवे कम्युनिकेशनमुळे लाईक्स, कमेंट या गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत. सहनशीलता कमी होत जाते.

- डॉ. जयप्रकाश केंद्रे, वैद्यकीय अधिकारी.

मैदानी खेळ आवश्यक...

मैदानी खेळामुळे चिडचिडेपणा दूर होतो. त्याचबरोबर शरीर मजबूत होते.

शिक्षणाबरोबर खेळसुद्धा आवश्यक आहे. आगामी काळात विविध आजारांना समोरे जावे लागणार की काय, अशी भीती आहे. खेळामुळे शरीर व मानसिक ताण दूर होतो. मुलांना मैदानी खेळ आवश्यक आहे.

- प्रा.दत्ता गलाले, क्रीडा प्रक्षिशक.

एकलपणा वाढला...

मुलांमध्ये एकाकीपणा वाढत आहे. खरंतर मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. परंतु, त्यांना खेळण्यासाठी गावात, शहरांमध्ये पुरेसे मैदान नाहीत. सोसायटी, गल्लीत मुले खेळण्यासाठी येत नाहीत. पालकांसोबत पुरेसा संवाद नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात मुलांत एकाकीपणा वाढत चालला आहे.

- जयश्री पवार, सहशिक्षिका