शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

दोन एकरात ४४ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST

शेतीत योग्य मशागत, बियाणांची निवड, वेळोवेळी खत व फवारणी केली की उत्पादन हमखास निघतेच. त्याला निसर्गाची योग्य साथ मिळाली ...

शेतीत योग्य मशागत, बियाणांची निवड, वेळोवेळी खत व फवारणी केली की उत्पादन हमखास निघतेच. त्याला निसर्गाची योग्य साथ मिळाली की, मग तर सोने पे सुहागा. असेच काही घडले तिवटघाळचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांच्या बाबतीत. रबी हंगामात त्यांनी तब्बल १८ एकर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली. यासाठी त्यांनी राहुरी विद्यापीठाचे फुले विक्रम हे बियाणे वापरले. क्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने सर्वत्र समान मेहनत करणे शक्य झाले नाही. ९ एकरात पाणी कमी पडल्याने त्या क्षेत्रावर ५५ क्विंटल उत्पादन निघाले. दुसरीकडे असलेल्या ७ एकरात ७५ क्विंटल हरभरा निघाला आहे. दोन एकरात आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. त्यात आंतरपीक म्हणून हरभरा पेरण्यात आला. याच दोन एकर क्षेत्रावर तब्बल ४४ क्विंटल हरभरा निघाल्याचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

तीन ते चार फुट काळी जमीन...

तिवघाळ शिवारात दोन ते चार फुट जमीन काळी आहे. दोन एकरात आंब्याची झाडे असल्याने स्प्रिंकलरने एकदा पाणी देता आले नाही. त्यामुळे भुईपाटाने दोनवेळा पाणी दिले. पेरणीनंतर ४५ दिवसांनी पहिले पाणी दिले अन् दुसरे पाणी ७२ दिवसांनी दिले. जवळपास अडीच ते तीन फुट उंचीची झाडे होती. रास केल्यावर दोन एकरात ६४ कट्टे हरभरा निघाला. त्याचे वजन घेतले असता तब्बल ४४ क्विंटल उत्पादन झाल्याचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

मशागतीचे नियोजन महत्वाचे- डॉ.नंदकुमार कुटे

राहुरी विद्यापीठाने २०१७ मध्ये हे फुले विक्रम हे बियाणे विकसित केले. हवामानातील बदल, कमी अधिक पाण्याला हे वाण अतिशय चांगले आहे. तिवटघाळचे शेतकरी शिवाजी पाटील यांनी दोन एकरात घेतलेले उत्पादन उच्चांकी आहे. त्यासाठी त्यांची मेहनत, मशागत महत्वाची ठरली. त्यांना ४४ क्विंटल उत्पादन निघाले. या वाणाचे हेक्टरी ६० क्विंटलपर्यंत उत्पादन निघू शकते, असा दावा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुंटे यांनी सांगितले.