शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दोन एकरात ४४ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST

शेतीत योग्य मशागत, बियाणांची निवड, वेळोवेळी खत व फवारणी केली की उत्पादन हमखास निघतेच. त्याला निसर्गाची योग्य साथ मिळाली ...

शेतीत योग्य मशागत, बियाणांची निवड, वेळोवेळी खत व फवारणी केली की उत्पादन हमखास निघतेच. त्याला निसर्गाची योग्य साथ मिळाली की, मग तर सोने पे सुहागा. असेच काही घडले तिवटघाळचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांच्या बाबतीत. रबी हंगामात त्यांनी तब्बल १८ एकर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली. यासाठी त्यांनी राहुरी विद्यापीठाचे फुले विक्रम हे बियाणे वापरले. क्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने सर्वत्र समान मेहनत करणे शक्य झाले नाही. ९ एकरात पाणी कमी पडल्याने त्या क्षेत्रावर ५५ क्विंटल उत्पादन निघाले. दुसरीकडे असलेल्या ७ एकरात ७५ क्विंटल हरभरा निघाला आहे. दोन एकरात आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. त्यात आंतरपीक म्हणून हरभरा पेरण्यात आला. याच दोन एकर क्षेत्रावर तब्बल ४४ क्विंटल हरभरा निघाल्याचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

तीन ते चार फुट काळी जमीन...

तिवघाळ शिवारात दोन ते चार फुट जमीन काळी आहे. दोन एकरात आंब्याची झाडे असल्याने स्प्रिंकलरने एकदा पाणी देता आले नाही. त्यामुळे भुईपाटाने दोनवेळा पाणी दिले. पेरणीनंतर ४५ दिवसांनी पहिले पाणी दिले अन् दुसरे पाणी ७२ दिवसांनी दिले. जवळपास अडीच ते तीन फुट उंचीची झाडे होती. रास केल्यावर दोन एकरात ६४ कट्टे हरभरा निघाला. त्याचे वजन घेतले असता तब्बल ४४ क्विंटल उत्पादन झाल्याचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

मशागतीचे नियोजन महत्वाचे- डॉ.नंदकुमार कुटे

राहुरी विद्यापीठाने २०१७ मध्ये हे फुले विक्रम हे बियाणे विकसित केले. हवामानातील बदल, कमी अधिक पाण्याला हे वाण अतिशय चांगले आहे. तिवटघाळचे शेतकरी शिवाजी पाटील यांनी दोन एकरात घेतलेले उत्पादन उच्चांकी आहे. त्यासाठी त्यांची मेहनत, मशागत महत्वाची ठरली. त्यांना ४४ क्विंटल उत्पादन निघाले. या वाणाचे हेक्टरी ६० क्विंटलपर्यंत उत्पादन निघू शकते, असा दावा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुंटे यांनी सांगितले.