शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द केली; परीक्षा शुल्क कधी परत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:17 IST

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिक्षण विभागाने दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर विभागीय मंडळातून ...

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिक्षण विभागाने दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर विभागीय मंडळातून जवळपास १ लाख ५ हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कही भरले होते. परीक्षा रद्द झाली, त्यामुळे परीक्षा शुल्क कधी परत करणार, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांमधून उपस्थित होत आहे.

लातूर विभागीय मंडळात नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. दहावी परीक्षेसाठी १,७८५ शाळांनी १ लाख ५ हजार ९१७ विद्यार्थ्यांचे अर्ज तर रीपिटर ४ हजार ४३७ विद्यार्थ्यांचे अर्ज बोर्डाकडे शुल्कासहित जमा केले होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी एकच सीईटी घेतली जाणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना अर्जासाठी ३७५ रुपये शुल्क आकारण्यात आले होते. जवळपास दोन कोटींहून अधिक शुल्क बोर्डाकडे जमा झाले आहेत. परीक्षा रद्द झाल्याने शुल्क कधी परत मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

लातूर बोर्डातील एकूण माध्यमिक शाळा- १,७८५

प्रतिविद्यार्थी परीक्षा शुल्क- ३७५

दहावी वर्गातील एकूण विद्यार्थी- १,०५,९१७

परीक्षा शुल्काची एकूण रक्कम- २.५ कोटी

पुढे काय होणार? विद्यार्थी संभ्रमात

वर्षभर शाळा बंद होत्या. त्यामुळे ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहिलो. परीक्षेची पूर्ण तयारी केली होती. मात्र परीक्षा रद्द झाल्या आहेत. पुढे काय होणार, हा प्रश्न आहे. -फैजोद्दीन सय्यद

-------

परीक्षेची तयारी झाली होती. आता परीक्षाच रद्द झाल्याने पुढे प्रवेशासाठी कोणती प्रक्रिया राबविणार, हा प्रश्न आहे. किमान ऑनलाइन पद्धतीने तरी परीक्षा घ्यायला पाहिजे होती. - सिद्धी बरकुमे

---

मध्यंतरी दहावीचे वर्ग सुरू झाले होते. त्यामुळे अभ्यासक्रमही पूर्ण झाला होता. मात्र बोर्डाने परीक्षा रद्द केल्या. अभ्यास पूर्ण झाला होता. परीक्षा घेणे गरजेचे होते. - भावना टाळकुटे

शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

दहावीच्या परीक्षेसाठी शाळांनी बोर्डाकडे अर्ज दाखल केले होते. शुल्क परताव्याबाबत शासनस्तरावरून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. योग्य निर्णय होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.