शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शेतातील गोठ्यात थाटू लागले संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:17 IST

नागरसोगा : मार्चपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ...

नागरसोगा : मार्चपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. परिणामी, गावातील काही जण शेतातील गोठ्यात जाऊन राहत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. मात्र, मागील चार-पाच महिन्यांत हा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊन लागले होते. मात्र, मार्च- एप्रिलपासून पुन्हा संसर्ग वाढला. राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी घोषित केली. त्यामुळे कामानिमित्ताने शहरात गेलेले नागरिक पुन्हा आपल्या मूळ गावी परतत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिकांत चिंता वाढली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी येथील काही जण शेतात जाऊन राहत आहेत.

औसा तालुक्यातील नागरसोगा येथील काही जण शेतात जाऊन राहत आहेत. शेतातील वातावरण आरोग्यास चांगले असल्याने आणि संपर्क होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती कमी झाली आहे. दरम्यान, शेतात वीज गुल होत असल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन शेतात सिंगल फेजद्वारे २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

शेतात वन्यजीवांचा वावर असतो, तसेच साप, विंचूची भीती असते. रात्री अंधारात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

शेतातील वातावरण चांगले...

नागरसोगा येथील तुकाराम पटवारी, बाबू गिरी, अजय पाटील, संतोष माळी, बाबा गांगले यांच्यासह गावातील अन्य काही नागरिक कुटुंबासह शेतात वास्तव्यास गेले आहेत. शेत शिवारातील वातावरण आरोग्यास चांगले असल्याने व संपर्क होत नसल्याने संसर्गाची भीती अत्यंत कमी आहे. त्यामुळे शासन नियमांचे आपोआप पालन होते.

दुपारच्या वेळी मुले शेतातील आंबा, चिकू, पेरूचा आस्वाद घेत आहेत, तसेच विविध खेळांचा आनंद लुटत आहेत, असे शेतात राहण्यास गेलेल्या कुटुंबांनी सांगितले. मात्र, वीजपुरवठा सुरळीत नसल्याने काही प्रमाणात अडचणी येत आहेत. महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी तुकाराम पटवारी यांनी केली.