शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील गोठ्यात थाटू लागले संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:17 IST

नागरसोगा : मार्चपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ...

नागरसोगा : मार्चपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. परिणामी, गावातील काही जण शेतातील गोठ्यात जाऊन राहत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. मात्र, मागील चार-पाच महिन्यांत हा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊन लागले होते. मात्र, मार्च- एप्रिलपासून पुन्हा संसर्ग वाढला. राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी घोषित केली. त्यामुळे कामानिमित्ताने शहरात गेलेले नागरिक पुन्हा आपल्या मूळ गावी परतत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिकांत चिंता वाढली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी येथील काही जण शेतात जाऊन राहत आहेत.

औसा तालुक्यातील नागरसोगा येथील काही जण शेतात जाऊन राहत आहेत. शेतातील वातावरण आरोग्यास चांगले असल्याने आणि संपर्क होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती कमी झाली आहे. दरम्यान, शेतात वीज गुल होत असल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन शेतात सिंगल फेजद्वारे २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

शेतात वन्यजीवांचा वावर असतो, तसेच साप, विंचूची भीती असते. रात्री अंधारात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

शेतातील वातावरण चांगले...

नागरसोगा येथील तुकाराम पटवारी, बाबू गिरी, अजय पाटील, संतोष माळी, बाबा गांगले यांच्यासह गावातील अन्य काही नागरिक कुटुंबासह शेतात वास्तव्यास गेले आहेत. शेत शिवारातील वातावरण आरोग्यास चांगले असल्याने व संपर्क होत नसल्याने संसर्गाची भीती अत्यंत कमी आहे. त्यामुळे शासन नियमांचे आपोआप पालन होते.

दुपारच्या वेळी मुले शेतातील आंबा, चिकू, पेरूचा आस्वाद घेत आहेत, तसेच विविध खेळांचा आनंद लुटत आहेत, असे शेतात राहण्यास गेलेल्या कुटुंबांनी सांगितले. मात्र, वीजपुरवठा सुरळीत नसल्याने काही प्रमाणात अडचणी येत आहेत. महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी तुकाराम पटवारी यांनी केली.