शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

घाेटभर पाण्याच्या शोधात वन्यजीवांची भटकंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST

निलंगा तालुक्यातील केळगाव येथील वनविभागाच्या जंगलात दहा पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सर्व पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. दिवसभरात ...

निलंगा तालुक्यातील केळगाव येथील वनविभागाच्या जंगलात दहा पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सर्व पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. दिवसभरात वन्य जीवाला पाण्याची गरज भासत असते. मात्र, एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एकाही पानवठ्यात पाणी नसल्याने या जंगलातून दुसऱ्या जंगलात वन्यजीवांना पाण्याच्या शाेधात भटकंती करावी लागत आहे. जंगलात अन्न, पाणी मिळत नसल्याने जंगलातील हरीण गावकुसाला येत आहेत. शिवारातील शेतात, रस्त्यावर वावरताना दिसून येत आहेत.

पावसाळ्याचे पाणी जंगलातील लहान मोठ्या तळ्यांत, खड्ड्यांमध्ये साठलेले असते. ते पाणी जानेवारी अखेरपर्यंत वन्य प्राणी आाणि पशू-पक्ष्यांच्या उपयाेगात येते. मात्र, जानेवारीनंतर हा जलसाठा संपला की, उन्हाळ्याची चाहूल लागते, पाण्यासाठी या वन्य प्राण्यांची, जिवांची भटकंती सुरु राहते. उन्हाचा पारा दिवसेंदिव वाढत आहे. या महिन्यात वन्यजिवांना पाण्याची गरज आहे. याकडे अद्यापही वनविभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. शासनाचे लाखो रुपये वन्यजीवांसाठी प्राप्त हाेतात. सध्याला जंगलातील दहाही पानवठे काेरडेठाक पडली आहेत. परिणामी, वन्यप्राणी हरीण, रानडुक्कर, लांडगा, माकड, मोर, लांडोर हे जंगल साेडून राठोडा, लंबोटा, झरी, केळगावच्या गावकुसाला येत आहेत. त्यांची पाण्याच्या भटकंती सुरुच आहे. काही हरीण केळगाव ते निलंगा मार्गावर पाण्यासाठी शाेधात भटकंती करताना दिसून येत आहेत. त्यामुळे मोकार कुत्रे त्यावर हल्ला करत आहेत. अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने जंगलातील पाणवठे कोरडेठाक आहेत, असे निलंगा येथील वनपरिमंडळ अधिकारी एस.आर. बन म्हणाले.