शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

प्रवाशांअभावी २०० बसेसची चाके जाग्यावरच थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात ४०० बसेस नियमित धावत हाेत्या. मात्र, मार्च २०२० पासून काेराेना महामारीने एसटी ...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात ४०० बसेस नियमित धावत हाेत्या. मात्र, मार्च २०२० पासून काेराेना महामारीने एसटी महामंडळाचे अर्थचक्र पूर्णत: काेलमडले आहे. राज्यातील लाॅकडाऊनने एस. टी. आणि त्यांचे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करणेही अवघड झाले आहे. केवळ २५ ते ४० टक्क्यांच्या भारमानावर सध्या एसटीचा प्रवास सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून एस.टी.ची चाके जाग्यावरच थांबली आहेत. ६ जूनपासून अनलाॅकची प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरू झाली. टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांचा अद्यापही प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाने पूर्ण क्षमतेने एस.टी. बसेस सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या लांब पल्ल्यासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर लालपरी धावत आहे.

मालवाहतुकीचा मिळाला आधार...

एस. टी. महामंडळाने आपल्या आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग शाेधले आहेत. काेराेनाच्या काळात सर्वच यंत्रणा काेलमडली असताना, एस़टी़ने मालवाहतुकीवर भर देत काही प्रमाणात उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत एस़टी़ला मालवाहतुकीचा आधार मिळाला आहे. मात्र, यातूनही महामंडळाची आर्थिक गरज भागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आर्थिक नियाेजनच काेलमडल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत.

वाडी-तांड्यावरील बसफे-या बंदच...

लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातून ग्रामीण भागातील गाव, वाडी-तांड्याच्या मार्गावर माेठ्या प्रमाणावर बससेवा सुरू करण्यात आली हाेती. मात्र, ‘काेराेना’ने सर्वच बसेस सध्या जाग्यावरच थांबल्या आहेत. लातूर विभागातील ४५० बसेसपैकी २०० बसेस आजही बंद आहेत. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण भागातील बसेस बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण भागातील दळणवळण थंडावले...

ज्या गावात रेल्वे अथवा खासगी वाहने पाेहोचली नाहीत, अशा गाव, वाडी-तांड्यावर महामंडळाची एसटी बस पाेहोचली असून, लालपरीला ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सध्या लालपरीच बंद असल्याने इतर पर्यायी वाहनांचा वापर करावा लागत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दळणवळण थंडावले आहे.

महामंडळाला मालवाहतुकीचा थाेडाफार आधार मिळाला आहे. आता कुरिअर सेवाही देण्याचा विचार महामंडळ करत आहे. कुरिअर सेवा ग्रामीण भागातील गाव, वाडी-तांड्यापर्यंत घेऊन जाण्याचा विचार सुरू आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू आहेत. परिणामी, एसटीला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.