शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

प्रवाशांअभावी २०० बसेसची चाके जाग्यावरच थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात ४०० बसेस नियमित धावत हाेत्या. मात्र, मार्च २०२० पासून काेराेना महामारीने एसटी ...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात ४०० बसेस नियमित धावत हाेत्या. मात्र, मार्च २०२० पासून काेराेना महामारीने एसटी महामंडळाचे अर्थचक्र पूर्णत: काेलमडले आहे. राज्यातील लाॅकडाऊनने एस. टी. आणि त्यांचे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करणेही अवघड झाले आहे. केवळ २५ ते ४० टक्क्यांच्या भारमानावर सध्या एसटीचा प्रवास सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून एस.टी.ची चाके जाग्यावरच थांबली आहेत. ६ जूनपासून अनलाॅकची प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरू झाली. टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांचा अद्यापही प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाने पूर्ण क्षमतेने एस.टी. बसेस सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या लांब पल्ल्यासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर लालपरी धावत आहे.

मालवाहतुकीचा मिळाला आधार...

एस. टी. महामंडळाने आपल्या आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग शाेधले आहेत. काेराेनाच्या काळात सर्वच यंत्रणा काेलमडली असताना, एस़टी़ने मालवाहतुकीवर भर देत काही प्रमाणात उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत एस़टी़ला मालवाहतुकीचा आधार मिळाला आहे. मात्र, यातूनही महामंडळाची आर्थिक गरज भागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आर्थिक नियाेजनच काेलमडल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत.

वाडी-तांड्यावरील बसफे-या बंदच...

लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातून ग्रामीण भागातील गाव, वाडी-तांड्याच्या मार्गावर माेठ्या प्रमाणावर बससेवा सुरू करण्यात आली हाेती. मात्र, ‘काेराेना’ने सर्वच बसेस सध्या जाग्यावरच थांबल्या आहेत. लातूर विभागातील ४५० बसेसपैकी २०० बसेस आजही बंद आहेत. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण भागातील बसेस बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण भागातील दळणवळण थंडावले...

ज्या गावात रेल्वे अथवा खासगी वाहने पाेहोचली नाहीत, अशा गाव, वाडी-तांड्यावर महामंडळाची एसटी बस पाेहोचली असून, लालपरीला ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सध्या लालपरीच बंद असल्याने इतर पर्यायी वाहनांचा वापर करावा लागत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दळणवळण थंडावले आहे.

महामंडळाला मालवाहतुकीचा थाेडाफार आधार मिळाला आहे. आता कुरिअर सेवाही देण्याचा विचार महामंडळ करत आहे. कुरिअर सेवा ग्रामीण भागातील गाव, वाडी-तांड्यापर्यंत घेऊन जाण्याचा विचार सुरू आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू आहेत. परिणामी, एसटीला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.