शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST

लातूर : बाभळगाव रोडवरील ‘आई पार्क’ येथे अनाथ, मतिमंद मुलांना मायेने घास भरवला जातो. या पार्कमध्ये सध्या ६५ ...

लातूर : बाभळगाव रोडवरील ‘आई पार्क’ येथे अनाथ, मतिमंद मुलांना मायेने घास भरवला जातो. या पार्कमध्ये सध्या ६५ मुलं आश्रयाला असून, यातील पाच-सहा मुलं बेड रेस्टवर, तर एक-दोन मुलांना नेहमीच दवाखान्यात न्यावे लागते. अशा या बालगृहाला गेल्या वर्षभरापासून अनुदानच मिळाले नाही. या अनाथ, निराधारांनी काय खावे, असा प्रश्न आहे.

श्री गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संत गाडगेबाबा अनाथ, मतिमंद मुलांचे बालगृह बाभळगाव रोडवरील आई पार्क येथे चालविले जाते. बालकल्याण समितीकडून अर्थात शासनाकडून अनाथ, मतिमंद मुलांना या संस्थेच्या बालगृहात पाठविले जाते. एका मुलाला दोन हजार रुपये वार्षिक अनुदान आहे. शंभर मुलांच्या मान्यता असलेल्या या बालगृहात सध्या ६५ मुलं आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून बालगृहाला शासनाकडून अनुदान मिळाले नाही. शिवाय, दोन वर्षांपासून रेशन अर्थात गहू, तांदूळ देणेही बंद झाले आहे. शासनाकडून अनुदानच न आल्यामुळे संस्था उसनवारीवर या अनाथ, निराधार मुलांचा सांभाळ करीत आहे. संस्थेचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या मायेने मुलांचा सांभाळ करतात. पुणे, मुंबई, तसेच अन्य ठिकाणाहून शासनाच्या बालकल्याण समितीकडून अनाथ मुले या संस्थेत आलेली आहेत.

उसनवारीवर अनाथ, मतिमंद मुलांचा सांभाळ

संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहामध्ये बालसमितीकडून आलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो. या बालगृहातील मुलांना आई-वडील अथवा कोणीही नातेवाईक नाही. अशा मुलांचा सांभाळ संस्था करते. संस्थेनेच या मुलांचे पालकत्व पत्करले आहे. शासनाकडून अनुदान मिळते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून अनुदान नाही. शिवाय, दोन वर्षांपासून गहू, तांदूळही दिला नाही. त्यामुळे संस्थेला उसनवारी करून मुलांचा सांभाळ करावा लागत आहे. ६५ मुलांपैकी चार-पाच मुलं बेडरेस्टवर आहेत, तर दोन-तीन मुलांना नेहमीच दवाखान्यात न्यावे लागते. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नावाखाली संस्थेला अनुदान दिले गेलेले नाही. रेशनचा पुरवठाही थांबविलेला आहे. महाराष्ट्रात अनाथ, मतिमंद मुलांचा सांभाळ करणारी ही एकमेव संस्था आहे. तरीही शासनाने अनुदान देण्याकडे कानाडोळा केला आहे. उसनवारीवर अनाथ, मतिमंद मुलांचा सांभाळ

संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहामध्ये बालसमितीकडून आलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो. या बालगृहातील मुलांना आई-वडील अथवा कोणीही नातेवाईक नाही. अशा मुलांचा सांभाळ संस्था करते. संस्थेनेच या मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. शासनाकडून अनुदान मिळते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून अनुदान नाही. शिवाय, दोन वर्षांपासून गहू, तांदूळही दिला नाही. त्यामुळे संस्थेला उसनवारी करून मुलांचा सांभाळ करावा लागत आहे. ६५ मुलांपैकी चार-पाच मुलं बेडरेस्टवर आहेत, तर दोन-तीन मुलांना नेहमीच दवाखान्यात न्यावे लागते. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नावाखाली संस्थेला अनुदान दिले गेलेले नाही. रेशनचा पुरवठाही थांबविलेला आहे. महाराष्ट्रात अनाथ, मतिमंद मुलांचा सांभाळ करणारी ही एकमेव संस्था आहे. तरीही शासनाने अनुदान देण्याकडे कानाडोळा केला आहे.