शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार भरला; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आले आहेत. मध्यंतरी गावागावांतील ...

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आले आहेत. मध्यंतरी गावागावांतील आठवडी बाजारावर प्रतिबंध करण्यात आला होता. तो आता मागे घेण्यात आला असल्याने आठवडी बाजारासह शहरातील बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. मात्र, नागरिकांचा मोठ्या प्रमाणात बेफिकीरपणा दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील आठवडी बाजारात भाजीपाल्यासह इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीत मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर होताना दिसून येत नाही. अनेक ठिकाणी विक्रेते आणि ग्राहक विनामास्कच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातून कोरोनाला निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत स्थानिक प्रशासन उपाययोजना करीत असले तरी त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नसल्याचे समोर आले आहे. पोलीस कर्मचारी बाजारात दाखल झाले की, मास्क लावले जातात. पुन्हा काढले जात असल्याचे दिसून येत आहे.

लातूर अनलॉक होताच बाजारात झाली गर्दी

लातूर जिल्हा अनलॉक होताच आठवडी बाजार पुन्हा सुरू झाले आहेत. बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. यातून बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाजारात विक्रेते-ग्राहक विनामास्क

ग्रामीण भागासह शहरातील आठवडी बाजारात भाजीपाल्यासह इतर साहित्यांची विक्री, खरेदी होत असते. यासाठी ग्राहकांचीही गर्दी दिसून येत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रेते आणि ग्राहकच काही ठिकाणी विनामास्क असल्याचे दिसून आले.

सोशल डिस्टन्सिंगसाठी मार्किंग गरजेचे

शहरातील भाजी मंडईसह ग्रामीण भागातील आठवडी बाजारात सोशल डिस्टन्स पाळण्याची गरज आहे. त्यासाठी मार्किंग करणे महत्त्वाचे आहे. ते मार्किंग सध्या कुठेच दिसून येत नाही. विक्रेत्यांसह ग्राहकांनाही कोरोना नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रशासनाकडून कारवाईचा बडगा

लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, चाकूर, जळकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी स्थानिक प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. काहींना जाग्यावरच दंड केला जात आहे. अनलॉक असले तरी नियमांचे पालन होण्याची खरी गरज आहे.

सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी बेजबाबदारपणे वागता येणार नाही. यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करीत काळजी घेण्याची गरज आहे. सातत्याने हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्कचा वापर कायम करणे हे महत्त्वाचे आहे. ज्या नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही, अशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. -