शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

लातूरमध्ये ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टद्वारे जलपुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 03:21 IST

पाणीपातळीत वाढ होण्यासाठी अभिनव उपक्रम

- संदीप शिंदेलातूर : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांत ४३७ ठिकाणी ‘रिचार्ज शाफ्ट’चा उपक्रम राबविण्यात आला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ५५ गावांत ‘रिचार्ज शाफ्ट’ उपक्रमामुळे जलपुनर्भरणास मदतझाली आहे.सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विंधन विहिरींची घनता जास्त असलेला भाग, भूजलाचा वाढता उपसा असलेले क्षेत्र तसेच पाणी पातळी घटलेला भाग आदी ठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागाने उपक्रम राबविला होता. त्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांतील ४३७ ठिकाणाची निवड करण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला. परिणामी, नदी, नाले, बंधारे, लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे.एक शाफ्ट पाच वर्षे काम करणारएक रिचार्ज शाफ्टचे काम योग्य पद्धतीने झाल्यास पाच वर्षासाठी ते काम करते. या उपाययोजनेस अत्यंत अल्पस्वरूपाच्या देखभालीची गरज असते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या नदी, बंधारे तसेच सार्वजनिक पिण्याच्या जलस्रोताजवळ शाफ्टची उभारणी करता येते. या प्रयोगामुळे जलसंवर्धनाचा उपक्रम यशस्वी झाला आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. गावस्तरावर नागरिकांच्या सहकायार्मुळे रिचार्ज शाफ्टची संकल्पना भविष्यात सर्वच गावात राबविली जाणार आहे.जलपुनर्भरणाच्या उपक्रमामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई दूर होईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. - डॉ. भालचंद्र संगनवार,वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग