शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १८ गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST

लातूर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. १५ गावे आणि तीन ...

लातूर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. १५ गावे आणि तीन वाडी-वस्त्यांनी पाणीटंचाई निवारणासाठी संबंधित पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव दाखल केले आहेत. सदरील प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले जाणार असून, त्यानंतर अधिग्रहणासाठी मंजुरी दिली जाणार आहे.

गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले होते तसेच पाणीपातळीतही काहीप्रमाणात वाढ झाली होती. मात्र, यंदा उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाणीटंचाईची समस्या काही गावांत निर्माण होत आहे. पंचायत समिती स्तरावर लातूर तालुक्यातील १, रेणापूर २, अहमदपूर तालुक्यातील ८ गावे आणि २ वाडी-वस्ती, उदगीर १, तर जळकोट तालुक्यातील ३ गावे आणि १ वाडी-वस्ती असे एकूण १५ गावे आणि ३ वाडी-वस्त्यांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ११ कोटी ७९ लाख ७० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, खासगी विहीर, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहीर घेणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, बुडक्या घेणे आदी उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. यामाध्यमातून १ हजार २६६ योजना राबविण्यात येणार आहेत. ज्या गावात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होईल त्या ग्रामपंचायतींना पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर तहसील स्तरावरून अधिग्रहण किंवा टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविण्याचे धोरण ठरविले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अधिग्रहणासाठी सर्वाधिक निधीची तरतूद...

पाणीटंचाई निवारणासाठी विहीर, विंधन विहीर अधिग्रहण करण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कृती आराखड्यांतर्गत खासगी विहीर, विंधन विहिरींच्या अधिग्रहणासाठी ४ कोटी ४९ लाख ४४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविण्यासाठी २ कोटी १४ लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ७६ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

३० जूनपर्यंत उपाययोजनांची अंमलबजावणी...

१ जानेवारी ते ३१ मार्च आणि १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत टंचाई निवारणासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याअंतर्गत पाणीपुरवठा विभागाच्या वतीने टंचाईची समस्या भेडसाविणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.