शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

जिल्ह्यातील १८ गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST

लातूर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. १५ गावे आणि तीन ...

लातूर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. १५ गावे आणि तीन वाडी-वस्त्यांनी पाणीटंचाई निवारणासाठी संबंधित पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव दाखल केले आहेत. सदरील प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले जाणार असून, त्यानंतर अधिग्रहणासाठी मंजुरी दिली जाणार आहे.

गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले होते तसेच पाणीपातळीतही काहीप्रमाणात वाढ झाली होती. मात्र, यंदा उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाणीटंचाईची समस्या काही गावांत निर्माण होत आहे. पंचायत समिती स्तरावर लातूर तालुक्यातील १, रेणापूर २, अहमदपूर तालुक्यातील ८ गावे आणि २ वाडी-वस्ती, उदगीर १, तर जळकोट तालुक्यातील ३ गावे आणि १ वाडी-वस्ती असे एकूण १५ गावे आणि ३ वाडी-वस्त्यांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ११ कोटी ७९ लाख ७० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, खासगी विहीर, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहीर घेणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, बुडक्या घेणे आदी उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. यामाध्यमातून १ हजार २६६ योजना राबविण्यात येणार आहेत. ज्या गावात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होईल त्या ग्रामपंचायतींना पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर तहसील स्तरावरून अधिग्रहण किंवा टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविण्याचे धोरण ठरविले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अधिग्रहणासाठी सर्वाधिक निधीची तरतूद...

पाणीटंचाई निवारणासाठी विहीर, विंधन विहीर अधिग्रहण करण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कृती आराखड्यांतर्गत खासगी विहीर, विंधन विहिरींच्या अधिग्रहणासाठी ४ कोटी ४९ लाख ४४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविण्यासाठी २ कोटी १४ लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ७६ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

३० जूनपर्यंत उपाययोजनांची अंमलबजावणी...

१ जानेवारी ते ३१ मार्च आणि १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत टंचाई निवारणासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याअंतर्गत पाणीपुरवठा विभागाच्या वतीने टंचाईची समस्या भेडसाविणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.