शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

पुनर्भरणामुळे पाणीपातळीत वाढ

By admin | Updated: July 25, 2016 00:37 IST

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे. लातूर शहरामध्ये अद्याप आठ हजार बोअरचे पुनर्भरण झाले असून त्यापैकी पहिल्याच पावसामध्ये पाच हजार बोअरच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जलपुनर्भरण महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. या पुनर्भरण प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणाऱ्या शहरातील कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. ही मोहीम हॉटेल्स, कारखाने, शाळा-महाविद्यालयांसह अनेक कुटुंबीयांकडे राबविण्यात आली आहे. लातूर शहरातील भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना आपल्या भविष्यातील पिढीसाठी इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून व सांडपाणी अडवून ते जमिनीमध्ये मुरविण्यासाठी जलपुनर्भरणाच्या माध्यमातून बोअर पुनर्भरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम राबविणाऱ्यांना शहरात मालमत्ता करामध्ये पाच टक्के सूट देण्याचे जाहीर केले असल्याचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी जाहीर केले असल्यामुळे आजपर्यंत आठ हजार जणांनी जलपुनर्भरण व बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे. लातूर शहरासह औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर नगरपालिकांनीही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत छतावरील पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरविणे यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पुनर्भरणाच्या पारंपरिक उपाययोजना रुफ वॉटर फिल्टर, रिचार्ज पीट, सोक पीट, बोअर पुनर्भरण आदींवर भर दिला आहे. या मोहिमेत आठ हजार जणांनी बोअर पुनर्भरण केले आहे. जल पुनर्भरण करणाऱ्या तीन हजार नागरिकांना प्रमाणपत्र दिले आहे.