शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

पुनर्भरणामुळे पाणीपातळीत वाढ

By admin | Updated: July 25, 2016 00:37 IST

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे. लातूर शहरामध्ये अद्याप आठ हजार बोअरचे पुनर्भरण झाले असून त्यापैकी पहिल्याच पावसामध्ये पाच हजार बोअरच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जलपुनर्भरण महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. या पुनर्भरण प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणाऱ्या शहरातील कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. ही मोहीम हॉटेल्स, कारखाने, शाळा-महाविद्यालयांसह अनेक कुटुंबीयांकडे राबविण्यात आली आहे. लातूर शहरातील भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना आपल्या भविष्यातील पिढीसाठी इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून व सांडपाणी अडवून ते जमिनीमध्ये मुरविण्यासाठी जलपुनर्भरणाच्या माध्यमातून बोअर पुनर्भरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम राबविणाऱ्यांना शहरात मालमत्ता करामध्ये पाच टक्के सूट देण्याचे जाहीर केले असल्याचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी जाहीर केले असल्यामुळे आजपर्यंत आठ हजार जणांनी जलपुनर्भरण व बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे. लातूर शहरासह औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर नगरपालिकांनीही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत छतावरील पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरविणे यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पुनर्भरणाच्या पारंपरिक उपाययोजना रुफ वॉटर फिल्टर, रिचार्ज पीट, सोक पीट, बोअर पुनर्भरण आदींवर भर दिला आहे. या मोहिमेत आठ हजार जणांनी बोअर पुनर्भरण केले आहे. जल पुनर्भरण करणाऱ्या तीन हजार नागरिकांना प्रमाणपत्र दिले आहे.