शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पुनर्भरणामुळे पाणीपातळीत वाढ

By admin | Updated: July 25, 2016 00:37 IST

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे. लातूर शहरामध्ये अद्याप आठ हजार बोअरचे पुनर्भरण झाले असून त्यापैकी पहिल्याच पावसामध्ये पाच हजार बोअरच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जलपुनर्भरण महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. या पुनर्भरण प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणाऱ्या शहरातील कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. ही मोहीम हॉटेल्स, कारखाने, शाळा-महाविद्यालयांसह अनेक कुटुंबीयांकडे राबविण्यात आली आहे. लातूर शहरातील भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना आपल्या भविष्यातील पिढीसाठी इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून व सांडपाणी अडवून ते जमिनीमध्ये मुरविण्यासाठी जलपुनर्भरणाच्या माध्यमातून बोअर पुनर्भरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम राबविणाऱ्यांना शहरात मालमत्ता करामध्ये पाच टक्के सूट देण्याचे जाहीर केले असल्याचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी जाहीर केले असल्यामुळे आजपर्यंत आठ हजार जणांनी जलपुनर्भरण व बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे. लातूर शहरासह औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर नगरपालिकांनीही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत छतावरील पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरविणे यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पुनर्भरणाच्या पारंपरिक उपाययोजना रुफ वॉटर फिल्टर, रिचार्ज पीट, सोक पीट, बोअर पुनर्भरण आदींवर भर दिला आहे. या मोहिमेत आठ हजार जणांनी बोअर पुनर्भरण केले आहे. जल पुनर्भरण करणाऱ्या तीन हजार नागरिकांना प्रमाणपत्र दिले आहे.