शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

‘सामान्य’ भासविणाऱ्यांना खुर्चीची प्रतीक्षा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:24 IST

गुणांसाठी शिक्षकांचा आटापिटा... ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ...

गुणांसाठी शिक्षकांचा आटापिटा...

५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात येतो. त्यासाठी निवड समिती असते. या पुरस्कारासाठी दरवर्षी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले जातात. शिक्षणासाठी नवोपक्रम, सामाजिक बांधिलकी असे विविध मुद्दे असतात. त्यासाठी ८० गुण तर २० गुण निवड समितीच्या हाती असतात. कोविडमुळे गेल्या वर्षी पुरस्कारासाठीची प्रक्रिया झाली नव्हती. सध्या जिल्हा परिषदेत ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक आकर्षक प्रस्ताव तयार करीत आहेत. मात्र, काही शिक्षक आपला प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर न करता थेट समितीच्या अध्यक्षांकडेच सादर करून आपले काम उत्कृष्ट आहे, हे सादरीकरण करीत आहेत. तेव्हा समिती पदाधिकारी आपले कार्य सर्वोत्कृष्ट आहे, पण अगोदर ८० गुणांपैकी चांगले गुण घ्या. तिथे चांगले गुण न मिळाले तर आमचे गुण निष्फळ ठरतील, असे स्पष्ट सांगून पाठवित आहेत.

विकेट पडू नये म्हणून दक्षता...

घरोघरी स्वच्छतागृह बांधावे आणि त्याचा नियमित वापर करावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांत मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे घरोघरी शौचालये बांधण्यात आली. मात्र, सध्या त्याचा कितपत वापर होतो, हे सर्वांनाच माहीत आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच ताण पडला आहे. नवीन अधिकारी नियुक्त होईपर्यंत त्यांना ‘किशोर’ म्हणून कार्य करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत आपली विकेट जाऊ नये म्हणून तेही दक्षता घेत आहेत.