शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

शेतकऱ्याची ३० वर्षांपूर्वीची वाट केली बंद; रस्ता खुला करावा म्हणून ११९ दिवसांपासून आंदोलन

By आशपाक पठाण | Updated: September 24, 2023 19:43 IST

प्रशासन कधी दखल घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आशपाक पठाण, लातूर : रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील गट नं. ६१५ मध्ये जाण्यासाठी ३० वर्षांपासून असलेला वहिवाट रस्ता एका शेतकऱ्याने अचानक बंद केला आहे. बंद केलेला रस्ता सुरू करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११९ दिवसांपासून एका शेतकरी दाम्पत्याने उपोषण सुरू केले आहे. प्रशासन कधी दखल घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खरोळा येथे अमीन रहीम शेख व तैमुनबी अमीन शेख यांनी ३० वर्षांपूर्वी ग.नं.६१५ मध्ये कायदेशीर स्वतंत्र जमीन खरेदी केली. तिथे शेतीवर विहीर, बैल-बारदाना उभा करून, आपले पक्के राहते घरही बांधले. शिवाय तेथेच आपल्या अपंग व गतिमंद मुलास ठेवून, त्यास अपंग जीमपण त्यांनी उभी केली. पुढे २-३ वर्षांनी समोर बाजूची, उर्वरित जमीन खरेदी केलेल्या एका शेतकऱ्याने त्यांची ती जुनी पारंपरिक वाट बंद केली आहे. त्यामुळे शेख कुटुंबीयांनी २९ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रेणापूर तहसीलदारांना ७ पत्रे दिली. तातडीने लेखी अहवालही मागविला. ८ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी स्वत: रस्त्याची पाहणी करून इतर शेतकऱ्यांशी संवादही साधला. १७ दिवस झाले तरी अद्याप रस्ता खुला करण्यात आला नाही. जोपर्यंत रस्ता खुला केला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलक अमीन शेख म्हणाले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनlaturलातूर