शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सेंद्रीच्या गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

By admin | Updated: February 16, 2017 19:19 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर अहमदपूर तालुक्यातील सेंद्री (सुनेगाव) येथील मतदारांनी बहिष्कार घातला.

ऑनलाइन लोकमत

अहमदपूर, दि. 16 -  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर अहमदपूर तालुक्यातील सेंद्री (सुनेगाव) येथील मतदारांनी बहिष्कार घातला. शंभर मतदार असलेल्या या गावातील एकाही मतदाराने मतदान केले नाही. रस्ता होत नसल्याने मतदारांनी बहिष्कार घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. 
अहमदपूर तालुक्यातील सेंद्री (सुनेगाव) हे दीडशे ते दोनशे लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात एकूण शंभर मतदार आहेत. या गावाला तालुक्याला येण्यासाठी रस्ताच नाही. सुमठाणा मार्गे १४ कि.मी. अंतर पार करून तालुक्याला यावे लागते. आनंदवाडीमार्गे केवळ पाच कि.मी. अंतर आहे. त्यामुळे आनंदवाडी मार्गे तालुक्याला जाण्यासाठी रस्ता करावा, अशी गावकऱ्यांची २००८ पासून मागणी आहे. सेंद्री, सुनेगाव व शेणी या तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून, आनंदवाडी गावातून मन्याड नदीवर पूल बांधून रस्ता करण्याची मागणी सातत्याने गावकरी करीत आहेत. माजी आ. बब्रुवान खंदाडे यांच्या काळात पुलाचे काम झाले. परंतु, रस्ता झाला नाही. विद्यमान आ. विनायकराव पाटील यांच्याकडेही गावकºयांनी रस्त्याची मागणी केली. काही शेतकºयांच्या शेतातून हा रस्ता जातो. त्यामुळे आमदार पाटील यांनी गावकरी आणि शेतमालकांची बैठक घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित शेतमालकाने रस्त्यासाठी जमीन दिली नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न जैसे थे आहे. यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकून प्रशासनाचा निषेध केला. 
सेंद्री गावातील मतदारांचा बहिष्कार असल्याचे समजताच उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी गावास भेट देऊन गावकºयांची समजूत घातली. मात्र गावकरी आपल्याच भूमिकेवर ठाम राहिले. मतदानाची ५.३० ची वेळ संपली तरी एकाही मतदाराने मतदान केले नाही. 
गावकरी म्हणाले, पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो...
पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी अडचण होते. रस्ता नसल्यामुळे दर पावसाळ्यात संपर्क तुटून गावकऱ्यांची गैरसोय होते. ही बाब वारंवार प्रशासनासमोर मांडण्यात आली. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. मात्र रस्ता झाला नसल्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार घातला. शंभर मतदारांपैकी एकाही मतदाराने मतदान केले नसल्याचे गावकºयांनी सांगितले.