शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

ग्रामसभा न घेतल्याने ग्रामस्थांनी सरपंचाला कोंडून कार्यालयाला ठोकले कुलूप

By आशपाक पठाण | Updated: September 6, 2022 16:54 IST

गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामसभा घेण्यात आली नाही.

लातूर: गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामसभा न घेतल्याने लातूर तालुक्यातील काटगाव गावातील संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी 10.30 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचाला कोंडून कुलूप ठोकले.

शासकीय नियमानुसार गावातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी व विविध विकास योजना राबविण्यासाठी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. परंतु गावचे सरपंच दत्ता गायकवाड यांनी गेल्या अडीच वर्षांपासून कसल्याही प्रकारे ग्रामसभा आयोजित न केल्याने मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले व बाहेरून कुलूप लावले.

शिवसेनेचे कार्यकर्ते विशाल शिंदे यांनी या संदर्भात माहिती देऊन सरपंच शासकीय नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केला. येत्या गुरुवारी ग्रामसभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुमारे एक तासानंतर कार्यालयाचे कुलूप काढून सरपंचांना सोडण्यात आले.

"गावातील विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. निकृष्ट दर्ज्याची कामे होत नाहीत आणि ग्रामपंचायत आणि सरपंच याची गांभीर्याने दखल घेत नाहीत आणि लोकांना प्रतिसाद देत नाहीत," असे विशाल शिंदे म्हणाले. अर्जुन लोखंडे, मल्हारी तनपुरे, सागर बोराडे, पंकज पाटील आदींसह गावकऱ्यांची आंदोलनादरम्यान प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :laturलातूर