शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

सात गावात विजेचा लपंडाव, ग्रामस्थ, शेतकरी झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST

या भागातील फिडर साठी अतिरिक्त फिटर बसविण्यात यावे, वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी त्रस्त ग्रास्थांसह शेतकऱ्यांनी केली ...

या भागातील फिडर साठी अतिरिक्त फिटर बसविण्यात यावे, वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी त्रस्त ग्रास्थांसह शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा सात गावाच्या लोकांनी महाविरतणच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सोनवळा, मंगरूळ, डाेंगर कोनाळी, धनगरवाडी, लाळी खु., लाळी बु. या सात गावांना वीज मंडळाच्या अतिरिक्त भाराचा फटका सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा बंद हाेत असल्यामुळे पाणी असून, गावांमध्ये कृत्रिम टंचाईला नागरिकांना समोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकदा अर्ज, विनंत्या करून महावितरण कंपनीकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे वसुलीचा तगादा सुरुच आहे. तर दुसरीकडे वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये घेतलेला उन्हाळी भुईमूग शेंग, उसाचे पाण्याअभावी नुकसान हाेत आहे. काही ठिकाणी उभे पीक वाळून जात आहे. याबाबत कार्यकारी उपअभियंता शंकर सावळे आणि कनिष्ठ अभियंता भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, तीनही फिटरच्या कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन सूचना केल्या आहेत, असे ते म्हणाले. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर अधिक दाब येत असल्याने हा प्रकार घडत आहे. याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

अतिरिक्त वाहिनीची व्यवस्था करु...

सोनवळा फिडरवर दाब वाढला असून, त्यासाठी विशेष अतिरिक्त उच्च दाबाची विद्युत वाहिनी बसवण्यात येईल. वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सावळे यांनी सांगितले.

येत्या एक-दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सरपंच संघटनेचे अध्यक्ष सरपंच माहेताब बेग, महेश पाटील, मनोहर वाकळे, निलेश नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदन पाटील, काजम पटेल, खाजा पटेल, सादत पटेल, उमाकांत कवठाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, रामेश्वर जाधव यांनी दिला आहे.